शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गर्दीवर फटाके फेकणाऱ्या पाच तरुणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:57 IST

Nagpur : सामन्यानंतरच्या विजयी सेलिब्रेशनवेळी गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर लक्ष्मीभुवन चौकात नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला. मात्र, काही अतिउत्साही तरुणांनी या जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सेलिब्रेशनच्या नावाखाली गोंधळ घातला व गर्दीवर फटाकेदेखील फेकले. पोलिसांनी पाच तरुणांवर कारवाई केली आहे.

सिम्पू धनराज रहांगडाले (१९, समतानगर नारी रोड), साहिल मनोज साहू (२०, वर्मा लेआउट, अंबाझरी), भावेश मगनभाई पटेल (३५, कुंज बिहारी अपार्टमेंट, लकडगंज), कर्णव जितेंद्र पटेल (२८) आणि आदित्य प्रज्वल फुलजेवार (२५, वरोरा, चंद्रपूर), अशी आरोपींची नावे आहेत. सामना संपल्यावर रात्री ११ वाजता वेस्ट हायकोर्ट रोडवरील लक्ष्मी भवन चौकात हजारो लोकांची गर्दी जमली होती. आरोपीदेखील गर्दीत उपस्थित होते. आरोपी फटाके पेटवत होते आणि एकमेकांवर फेकत होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. अशी परिस्थिती पाहून पोलिस नागरिकांना संयमाने सेलिब्रेशन करण्याचे आवाहन करत होते. मात्र, आरोपींचा गोंधळ सुरूच होता. त्यांचा एका व्यक्तीशी वाददेखील झाला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशीदेखील हुज्जत घातली. अखेर पोलिस कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कुमक बोलावली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना अंबाझरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी