शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:24 PM

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या वर्षाकरिता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे, हे विशेष. जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटवर पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. शाळेने भरलेल्या यु-डायसनुसार वर्ग १ ते ५ ला ९९,१११ विद्यार्थी, ५ ते ८ ला ९८, ८०५ असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येणार आहे.इयत्ता १ ते ८ मधील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना केले आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जून रोजी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा