लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व घटकांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून, आंदोलनाऐवजी संवादातून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, शेतकरी आंदोलनाबाबत बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि डॉ. अजित नवले यांच्याशी संवाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. शासन या विषयांवर गंभीर असून, लवकरच सकारात्मक तोडगा निघेल. मुख्यमंत्री यांनी ४० ते ४५ ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. हैदराबाद गॅझेटमधील खऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आधारित जीआर योग्य असून, त्यावर संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. खोटे प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होईल; पण खऱ्या कुणबींवर अन्याय होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदार यादी आरोपाबाबत बावनकुळे म्हणाले, काहीजण पराभव गृहीत धरून आधीच आरोप करत आहेत. हा निव्वळ राजकीय खोटारडेपणा आहे. ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून महायुती विजयी होईल. मतदार ठामपणे महायुतीसोबत आहे.
पंतप्रधानांना भेटण्यात काहीच गैर नाही
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनडीएचे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यात काहीच गैर नाही, उलट महायुती अधिक मजबूत होत आहे. संजय राऊत हे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धान नुकसानाबाबत पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : Minister Bawankule stated that the government is committed to public welfare and a solution will emerge through dialogue. Discussions are ongoing with farmer leaders. He clarified the Kunbi caste certificate issue and refuted voter list allegations, expressing confidence in the Mahayuti's victory. He defended Eknath Shinde's meeting with Modi.
Web Summary : मंत्री बावनकुले ने कहा कि सरकार जन कल्याण के लिए प्रतिबद्ध है और संवाद से समाधान निकलेगा। किसान नेताओं के साथ चर्चा जारी है। उन्होंने कुनबी जाति प्रमाण पत्र मुद्दे को स्पष्ट किया और मतदाता सूची के आरोपों का खंडन करते हुए महायुति की जीत पर विश्वास जताया। उन्होंने शिंदे की मोदी से मुलाकात का बचाव किया।