शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : तर मग ६० तासांचा अट्टाहास का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 20:25 IST

पुण्याच्या लोकांना दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत कुणी त्रास दिलेले चालत नाही, असा विनोद सर्वपरिचित आहे. हा विनोद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होय. तर मुंबईप्रमाणेच नागपूरचे संमेलन सलग ६० तास करण्याचा अट्टाहास अ.भा. मराठी नाट्य परिषद व स्थानिक आयोजकांनी केला आणि तो पहिल्याच दिवशी आपटला. एकतर रात्रीच्या नाटकाला प्रेक्षकांची संख्या नसल्यागत होती आणि नाटक उशिरा सुरू झाल्याने असलेल्या प्रेक्षकांनीही खुर्चीतच माना टाकल्या.

ठळक मुद्देरात्रीच्या नाटकांना प्रेक्षकांची वानवा : असलेल्यांनी माना टाकल्या : वेळेचेही नियोजन नाही

निशांत वानखेडे/मंगेश व्यवहारे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याच्या लोकांना दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत कुणी त्रास दिलेले चालत नाही, असा विनोद सर्वपरिचित आहे. हा विनोद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होय. तर मुंबईप्रमाणेच नागपूरचे संमेलन सलग ६० तास करण्याचा अट्टाहास अ.भा. मराठी नाट्य परिषद व स्थानिक आयोजकांनी केला आणि तो पहिल्याच दिवशी आपटला. एकतर रात्रीच्या नाटकाला प्रेक्षकांची संख्या नसल्यागत होती आणि नाटक उशिरा सुरू झाल्याने असलेल्या प्रेक्षकांनीही खुर्चीतच माना टाकल्या.सध्या कार्यरत असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीने मागील वर्षी मुंबईत झालेल्या ९८ व्या संमेलनातील कार्यक्रम सलग ६० तास चालविण्याचा पराक्रम केला होता. यासाठी कार्यकारिणीच्या लोकांनी परिश्रम घेतले यात त्यांचे श्रेयच आहे. मात्र मुंबईत झाले म्हणून ते नागपुरातही आपण करू हा अट्टाहास करणे म्हणजे अतिविश्वास बाळगणे होईल, असेही त्यांना वाटले नाही. बरे परिषदेने हा प्रस्ताव मांडला म्हणून स्थानिक आयोजकांनी प्रेक्षकांचा विचार न करता त्यास होकार देणे कितपत योग्य आहे, असा सवाल अनेकांनी केला.सलग कार्यक्रमाच्या नियोजनानुसार संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री १ वाजता ‘आक्रोश’ या झाडीपट्टीच्या नाटकाचा प्रयोग ठरला होता. मात्र सुरुवातीलाच वेळ झाल्यामुळे पुढील प्रत्येक कार्यक्रम उशिरा होतील, हे निश्चितच होते आणि झालेही तसेच. कविवर्य सुरेश भट सभागृहात रात्री १० वाजता अभिनेता भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक ११ नंतरच सुरू झाले आणि त्याचा फटका शेवटच्या नाटकालाही बसला. लोकप्रिय नाटक आणि त्यात भरत जाधव असल्याने प्रेक्षकांनी हे नाटक होईपर्यंत तग धरला आणि १ ते सव्वा वाजताच्यादरम्यान हे नाटक संपताच बहुतेक प्रेक्षकांनी घरचा रस्ता धरला. निम्म्यापेक्षा जास्त सभागृह रिकामे झाले होते. पाचपन्नास राहिले ते झाडीपट्टीचे चाहते आणि काही रंगकर्मी. त्यातही १ वाजता सुरू होणारे नाटक रात्री ३ वाजतापर्यंत सुरुच झाले नव्हते. त्यामुळे सभागृहातील प्रेक्षकही निद्राधीन झाले होते. नाटक सुरू झाल्यानंतर किती पे्रक्षकांनी त्याचा आस्वाद घेतला हा विचाराचाच प्रश्न आहे.आयोजनातील एका स्थानिक पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून ‘नागपूरच्या प्रेक्षकांना नाटकांची जाण नाही’असे म्हटले होते.दिग्गज साहित्यिक, नाटककार प्र.के. अत्रे एकेकाळी बोलले होते, ‘नागपूरचा प्रेक्षक चोखंदळ आहे व त्यांना सकस काहीतरी हवं असतं. नाटक आवडलं नाही तर ते रंगमंचाकडे पाठ करून बसायलाही मागेपुढे पाहत नाही.’ त्यामुळे नागपूरच्या प्रेक्षकांची जाणीव ठेवून कार्यक्रमांचे नियोजन आखणे अधिक सोईचे ठरले असते आणि रात्रीचे कार्यक्रम ठेवायचेच होते तर प्रेक्षक रात्रीही संमेलन स्थळाकडे वळतील, त्या दर्जाचे कार्यक्रम ठेवणे आवश्यक होते, असेही मत अनेकांनी मांडले. झाडीपट्टीची नाटके रात्री का?संमेलनात झाडीपट्टीच्या नाटकांना संधी देण्यात आली. मात्र दोन्ही दिवशी ही नाटके मध्यरात्री १ वाजता ठेवण्यात आली. पहिल्या दिवशी झाडीपट्टीचे ‘आक्रोश’ हे नाटक १ ऐवजी रात्री ३ नंतर सुरू झाले व त्यावेळी प्रेक्षक संख्या कमी होती. दुसºया दिवशीही ‘अस्सा नवरा नको ग बाई’ हे नाटक रात्री १ वाजताचे आहे. त्यामुळे नाटक रात्री का ठेवले, असा सवाल विचारला जात आहे. आम्हाला रात्रीचे नाटक करण्याची सवय आहे, मात्र नागपूरच्या प्रेक्षकांचे काय? ‘पुन्हा सही रे...’ या व्यावसायिक नाटकाच्यापूर्वी झाडीपट्टीच्या नाटकाला संधी द्यायला हवी होती, अशा भावनाही काहींनी मांडल्या. संधी देऊनही उपेक्षा झाल्याचे म्हटले जात आहे.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी