शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात धावल्या ७० बसेस; उत्पन्न मिळाले फक्त पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत २२ लाख रुपयांवर आले होते, ते या दोन दिवसात चांगलेच खालावले आहे.

नागपूर विभागामध्ये असलेल्या काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड या चार ग्रामीणमधील आगारांसह नागपूर शहरात चार असे एकूण आठ आगार आहेत. गणेशपेठ आगार सर्वात मोठे आहे. येथे नियमित १,१५० ते १,२०० फेऱ्या असतात. मात्र शनिवारी ३६५ व रविवारी २६७ फेऱ्या सोडण्यात आल्या. आगारात ८० बसेस असल्या तरी फक्त २५ बसेस या दोन दिवसात धावल्या. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नागपूर विभागात ४५० बसेस असल्या तरी ‘ब्रेक द चेन’ काळात २०० बसेस चालविल्या जात होत्या. या दोन दिवसात ६० ते ७० बसेस जिल्ह्यात धावल्या. नियमित फेऱ्या एक लाख ६० हजार किलोमीटर असायच्या. ब्रेक द चेन काळात ८० हजार किलोमीटर आणि या दोन दिवसात २० हजार किलोमीटरवर प्रवास आला.

...

नागपूर जिल्ह्यातील आठ आगारातील एकूण बसेस : ४५०

दोन दिवसात धावलेल्या बसेस : ६० ते ७०

सर्व आगारांमधील फेऱ्या : २४०

दोन दिवसात मिळालेले उत्पन्न : ४ ते ५ लाख

...

बॉक्स

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर

नागपूर विभागातील आठही आगार मिळून २,७५० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दोन हजारांच्या संख्येतील वाहक आणि चालकांची सेवा अत्यावश्यक श्रेणीत येते, तर अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात आली होती. बसेसच्या फेऱ्या घटल्याने या दोन दिवसात वाहक आणि चालकांनाही गरजेनुसार कामावर बोलावण्यात आले होते.

...

कोट

विभागात महामंडळाला दोन दिवसात मोठे नुकसान झाले. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारी पूर्ण क्षमतेने वाहतूक राहील. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

...

बॉक्स

दोन दिवसात १५ लाखांचा तोटा

- शनिवार आणि रविवार या दोन दिवसात नागपूर आगाराला १५ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. अलीकडच्या काळात २२ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज असायचे, ते या दोन दिवसात फक्त ४ ते ५ लाख रुपयांवर आले.

- या दोन दिवसात ८० टक्के प्रवासी सेवा बंद करावी लागली होती. लांब पल्ल्यांच्या बसेसही कमी कराव्या लागल्या. या फेऱ्यांना प्रवाशी अगदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या अनुभवानंतर रविवारी फेऱ्यांच्या संख्येत घट करण्यात आली.

...