शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ६०० आरामशीन विना परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:32 IST

नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून नूतनीकरण नाही : आग नियंत्रण यंत्रणा नसल्याने आगीचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महापालिका क्षेत्रात ३५० तर महानगर क्षेत्रात जवळपास २५० आरामशीन आहेत. वास्तविक आरामशीन चालविताना अग्निशमन विभागाच्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु एकाही आरामशीनने नियमांची पूर्तता केलेली नाही. अनेक आरामशीन ब्रिटिशकालीन परवान्यावर सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना नाहीत. अशा परिस्थितीत आगीची घटना घडली तर मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.शहर व महानगर क्षेत्रातील आरामशीनच्या परवान्याचे नूतनीकरणदेखील झाले नाही. या धोक्याची कल्पना महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही आली आहे. यामुळे विभागाने वर्षभरापूर्वी आरामशीन मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. यात आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली होती, मात्र मशीन मालकांनी याची दखल घेतली नाही. आरामशीन चालविण्यासाठी वन विभागाचा परवानादेखील आवश्यक आहे. तर वन विभागाच्या या परवान्यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असल्याने अग्निशमन विभागाने वन विभागाला पत्र पाठवून अटींची पूर्तता न करणाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशी सूचना केली आहे. अग्निशमन विभागाच्या पत्रानुसार वन विभागाकडून आवश्यक उपाययोजना नसलेल्या आरामशीनचे परवाने नूतनीकरण केले जात नसल्याने आरामशीन चालकांची आता धावपळ सुरू झाली आहे.मनपाच्या तिजोरीत येतील १२ कोटीआरामशीनच्या ठिकाणी बांधकाम करताना नगर रचना विभागाकडून बांधकामाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. आरामशीन चालकांनी बांधकाम मंजुरी व अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास यातून महापालिकेच्या तिजोरीत १२ ते १३ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो.सर्वाधिक आगीच्या घटना आरामशीनच्याशहरात आगीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना आरामशीनला आग लागण्याच्या घडतात. परंतु असे असतानाही आरामशीनच्या ठिकाणी पाणी, हायड्रन्ट सुविधा उपलब्ध नाहीत. आरामशीनचा परवाना घेताना आग नियंत्रणाच्या सुविधा बंधनकारक आहेत.वन विभागाला पत्र पाठविलेआरामशीनचा परवाना घेताना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु शहर व महानगर क्षेत्रातील आरामशीन चालकांनी अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र घेतलेले नाही. यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आरामशीन चालकांनी पाणी, हायड्रन्ट यासारख्या आवश्यक बाबींची व्यवस्था केलेली नाही. याचा विचार करता अग्निशमन विभागाने वन विभागाला पत्र पाठविले आहे. आरामशीनचे परवाने नूतनीकरण करताना अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र असल्याशिवाय परवाना नूतनीकरण करू नये, असे यात म्हटले आहे.-राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी

 

टॅग्स :nagpurनागपूरMuncipal Corporationनगर पालिका