शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना

By निशांत वानखेडे | Updated: September 5, 2023 18:07 IST

नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

नागपूर : देशभर मंगळवारी शिक्षक दिन साजरा होत असताना चंद्रपूर येथील सैनिक शाळेच्या प्रशासनाने आदल्या दिवशी सोमवारी ५२ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्रपूर येथील शासकीय सैनिकी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने २०१९ साली घेतला होता. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतचे कुठलेही परिपत्रक सरकारने काढले नव्हते. दरम्यान चंद्रपूरच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे व शिक्षण शुल्क न आकारण्याची निर्देश सैनिक शाळेला दिले होते. शासन निर्णय निर्गमित करण्याची कारवाई सुरू असून तसे परिपत्रक पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल, असे निर्देशित पत्रात नमूद होते. याच आधारावर विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासून शाळेत प्रवेश देण्यात आला. दुसऱ्या बॅचमध्येही २७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यातील सर्व विद्यार्थी आता आठवी व नवव्या वर्गात पोहचले आहेत.

मात्र चार वर्षे लोटूनही शासनाने निर्णयाचा जीआर काढला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही शाळेला मिळाली नाही. अखेर शाळेने ४ सप्टेंबर रोजी सर्व ५२ प्रवेशित विद्यार्थ्यांना वर्गात बसू देण्यात आले नाही व वसतीगृहात थांबण्यास सांगितले. त्यांच्या पालकांना बोलावून वसतीगृहातून पाल्यांना घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष आणि नैराश्य पसरले आहे.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टूडंट फेडरेशनचे डॉ. सिद्धांत भरणे यांनी सांगितले, सरकारने परिपत्रक काढून शिष्यवृत्ती मिळेपर्यंत शाळेने मुलांना फी भरण्यासाठी दबाव टाकू नये आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नये, असे निर्देश दिले होते. मात्र शाळेने शासनाच्या पत्राला केराची टोपली दाखविली. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन मुलांना तसेच पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत ही कारवाई थांबवून मुलांना नियमित शाळेत प्रवेश देत शैक्षणिक नुकसान थांबविण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाTeachers Dayशिक्षक दिन