शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:08 AM

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये घट : १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा घटत असून २०१९ मध्ये वर्षभरात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. यापैकी ४१ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १०५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९.०८ टक्के म्हणजेच ७३ प्रकरणे अपात्र ठरली. तर तेवढीच प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.२०१५ मध्ये सर्वाधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१९ या ५ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल १ हजार ५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९०१ म्हणजेच ५६.६० टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली तर ६१७ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तर ७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.सप्टेंबर, जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या२०१९ साली झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक ३० आत्महत्या या सप्टेंबर महिन्यात झाल्या. तर त्याखालोखाल जून महिन्यात २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता