शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

१०५ वंचित जोडप्यांचे रविवारी गडचिरोलीत ‘शुभमंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:26 IST

रविवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गडचिरोलीच्या अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील १०५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन नक्षली जोडपीही करणार ‘नवीन सुरुवात’लग्नानंतरही स्वीकारणार पालकत्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, जिमलगट्टा...ही सर्व गडचिरोली जिल्ह्याच्या निबिड अरण्यात वसलेली गावे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून फार लांब राहिलेली. अशा या अतिदुर्गम गावातील विवाहइच्छुकांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याची ‘नवीन सुरुवात’ आनंददायी करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, रविवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गडचिरोलीच्या अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील १०५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मैत्री परिवार संस्था, नागपूर, गडचिरोली पोलीस, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नागपूर व साई भक्त साई सेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या सामूहिक विवाह सोहळ्यात नक्षल चळवळीपासून फारकत घेऊन एका नवीन आयुष्याचा प्रारंभ करणाऱ्या दोन जोडप्यांचेही शुभमंगल होणार आहे. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, धर्मादाय आयुक्त विजयसिंग चौव्हाण, साई भक्त साई सेवक परिवारचे राजीव जैयस्वाल उपस्थित होते.मैत्री परिवार संस्थेने तीन वर्षांआधी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला. तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने आदिवासी भागामध्ये वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप, असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत तेथे राबविले जात आहे. याच क्रमात आता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होणाºया या सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटांचा भव्य विवाह मंडप, १०५ जोडपी म्हणजे एकूण २१० जणांची भव्य पंगत, २० हजार फुटांचा जेवणाचा स्वतंत्र मंडप अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

१० विभागातील ५५ गावांच्या वर-वधूंचा सहभागया सामूहिक विवाह सोहळ्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे एकूण १० विभाग करण्यात आले असून, या विभागांच्या ५५ गावांतील २१० वर-वधूंचे लग्न या सोहळ्यात लागणार आहे. यामध्ये गडचिरोली विभागातून १२ जोडपी, कुरखेडा-१४, धानोरा-१०, पेंढरी कॅम्प-११, अहेरी-८, एटापल्ली-८, हेडरी-८, भामरागड-१५, जिमलगट्टा-१० तर सिरोंंचा विभागातून ९ जोडप्यांचा समावेश आहे.

लग्नानंतरही स्वीकारणार पालकत्वया आदिवासी तरुण-तरुणींचे लग्न जुळवून आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला आणि हा सोहळा घडून आला. या सोहळयाला मदत करणाऱ्या संस्था केवळ लग्न लावून मोकळया होणार नसून या सर्व जोडप्यांचे पुढच्या दीड वर्षापर्यंत पालकत्व त्या स्वीकारणार आहेत. या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात कुठलीही अडचण आली तर त्यासाठी या संस्थांतर्फे मदत केली जाणार आहे. लग्नप्रसंगीही नवऱ्या मुलीला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडे, वर-वधूंचे कपडे, त्यांच्या आई-वडिलांचा अहेर असा सर्व खर्च आयोजक संस्था करणार आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक