शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

१०५ वंचित जोडप्यांचे रविवारी गडचिरोलीत ‘शुभमंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:26 IST

रविवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गडचिरोलीच्या अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील १०५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन नक्षली जोडपीही करणार ‘नवीन सुरुवात’लग्नानंतरही स्वीकारणार पालकत्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, जिमलगट्टा...ही सर्व गडचिरोली जिल्ह्याच्या निबिड अरण्यात वसलेली गावे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून फार लांब राहिलेली. अशा या अतिदुर्गम गावातील विवाहइच्छुकांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याची ‘नवीन सुरुवात’ आनंददायी करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, रविवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गडचिरोलीच्या अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील १०५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मैत्री परिवार संस्था, नागपूर, गडचिरोली पोलीस, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नागपूर व साई भक्त साई सेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या सामूहिक विवाह सोहळ्यात नक्षल चळवळीपासून फारकत घेऊन एका नवीन आयुष्याचा प्रारंभ करणाऱ्या दोन जोडप्यांचेही शुभमंगल होणार आहे. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, धर्मादाय आयुक्त विजयसिंग चौव्हाण, साई भक्त साई सेवक परिवारचे राजीव जैयस्वाल उपस्थित होते.मैत्री परिवार संस्थेने तीन वर्षांआधी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला. तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने आदिवासी भागामध्ये वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप, असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत तेथे राबविले जात आहे. याच क्रमात आता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होणाºया या सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटांचा भव्य विवाह मंडप, १०५ जोडपी म्हणजे एकूण २१० जणांची भव्य पंगत, २० हजार फुटांचा जेवणाचा स्वतंत्र मंडप अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

१० विभागातील ५५ गावांच्या वर-वधूंचा सहभागया सामूहिक विवाह सोहळ्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे एकूण १० विभाग करण्यात आले असून, या विभागांच्या ५५ गावांतील २१० वर-वधूंचे लग्न या सोहळ्यात लागणार आहे. यामध्ये गडचिरोली विभागातून १२ जोडपी, कुरखेडा-१४, धानोरा-१०, पेंढरी कॅम्प-११, अहेरी-८, एटापल्ली-८, हेडरी-८, भामरागड-१५, जिमलगट्टा-१० तर सिरोंंचा विभागातून ९ जोडप्यांचा समावेश आहे.

लग्नानंतरही स्वीकारणार पालकत्वया आदिवासी तरुण-तरुणींचे लग्न जुळवून आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला आणि हा सोहळा घडून आला. या सोहळयाला मदत करणाऱ्या संस्था केवळ लग्न लावून मोकळया होणार नसून या सर्व जोडप्यांचे पुढच्या दीड वर्षापर्यंत पालकत्व त्या स्वीकारणार आहेत. या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात कुठलीही अडचण आली तर त्यासाठी या संस्थांतर्फे मदत केली जाणार आहे. लग्नप्रसंगीही नवऱ्या मुलीला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडे, वर-वधूंचे कपडे, त्यांच्या आई-वडिलांचा अहेर असा सर्व खर्च आयोजक संस्था करणार आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक