शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अलौकिक राजाच्या कार्याला अनोखी सलामी

By अतुल कुलकर्णी | Updated: February 11, 2018 07:15 IST

बडोदे येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनचरित्रावरील १२ खंडांचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त...

- अतुल कुलकर्णीआजच्या काळात कोणी चांगले काम केले तरी त्यावर आधी विश्वास बसत नाही आणि बसला तरी त्या कामापेक्षा त्यामागच्या हेतूविषयीच्या शंकाच जास्ती येऊ लागतात. मात्र ज्याने त्याने त्यांना वाटतील ते अर्थ काढत जावे, आपण मात्र काम करत राहावे या सद्हेतूने महाराष्ट्र शासनाने आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधना प्रकाशन समितीचे सदस्यसचिव बाबा भांड यांनी एक महत्वपूर्ण काम उभे करून दाखवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनकल्याणाचा ध्यास घेत आदर्श सुप्रशासनाचे उदाहरण घालून देणा-या सयाजीराव गायकवाड यांचे काम पाहिले तर त्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते हे लक्षात येते. हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील तत्कालिक बहुतेक युगपुरुषांना त्यांनी केवळ मदतच केली नाही तर सुशासन, साहित्य, कलांचे ते खरे पोशिंदे होते. इ.स. १८८२ साली अंत्यजांसाठी, आदिवासींसाठी हुकूम काढून शिक्षण सुरू करणारे ते द्रष्टे महाराज होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामात एकट्या महाराजांनी देशभरातील क्रांतिकारकांना मदत करून ब्रिटिश सरकारशी आयुष्यभर संघर्ष केला, असा नवा इतिहास पुढे आलाच आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी त्यांनीच प्रथम मोठी मदत केली. पितामह दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या राष्ट्रपुरुषांना मदत करून त्यांनी पाठिंबाही दिला होता. चौसष्ट वर्षे राज्य करणारे हिंदुस्थानातील ते पहिले राजा होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ते जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी श्रीमंतीत पहिला नंबर फोर्ड यांचा होता.प्रशासनात सयाजीरावांनी सुरू केलेल्या पहिल्याच प्रयोगाची यादी भली मोठी आहे व आजही ती तेवढीच विलक्षणपणे स्वत:चे पहिलेपण टिकवून आहे.

१८७५ साली स्वतंत्र शिक्षण विभागाची स्थापना, १८८२ साली आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण व वसतिगृह देण्याचा जगातला पहिला हुकूम त्यांनी काढला. १८९० साली महसूल विभागातून स्वतंत्र शेती खाते त्यांनी सुरू केले. १८८५ मध्ये आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी गणदेवी येथे काढला. भारतातील ग्रंथालय चळवळीचेही ते पितामह आहेत. त्याकाळी ८७० ग्रंथ प्रकाशनात लेखक, प्रकाशकांना मदत करून ते त्यांचे आधारस्तंभ बनले.

अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वाच्या जीवनचरित्राचा, असामान्य कार्याचा अभ्यास, संशोधन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अक्षरधनाचा वारसा एका जाणिवेतून आणि जिद्दीने जपलाच नाही, तर १२ खंडांच्या माध्यमातून तो जनतेसमोर आणला आहे. यासाठी गेल्या दोन- अडीच वर्षांत झपाटल्यासारखे काम ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी केले. त्यांच्या समितीने पहिल्या वर्षी पंधरा हजार पानांच्या २५ खंडांची तयारी केली. पहिल्या टप्प्यातील जवळपास साडेसहा हजार पृष्ठांचे बारा खंड त्यातून तयारही झाले. येत्या १६ फेब्रुवारी रोजीअ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांच्या उपस्थितीत होत आहे. साहित्य संमेलनात यापेक्षा मोठे कार्य दुसरे कोणते असणार?..(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)