शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

"मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू"; शरद पवार- मुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:50 IST

दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Uddhav Thackeray on Dharavi Redevelopment : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरुन महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मी धारावीच्या विकासाआड नाही, धारावीकरांना तिथल्या तिथं घर मिळालंच पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे हे कुटुंबासह तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रकल्पावरुन विकसक अदाणी यांच्यावर निशाणा साधला. जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावेल त्यांच्या विरोधात मी उभा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी अदानी माझे शत्रू नाहीत असेही म्हटलं आहे.

मी धारावीच्या विकासाआड नाही, धारावीकरांना तिथल्या तिथं घर मिळालंच पाहिजे. धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईत एका धारावीच्या २० धारावी करण्याचा डाव अदानींच्या माध्यमातून सरकारकडून सुरू आहे. पण ते आम्ही होऊ देणार नाही. कोणीही आले तर आम्ही मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धारावीत टीडीआर काढला गेला तेव्हा टीडीआर वापरण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. हा सगळा गैरप्रकार आहे आणि आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. सरकार आल्यानंतरही टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी होऊ देणार नाही. त्या टेंडरच्या अटी अदानींना जमत नसतील तर त्यांनी सांगावे आणि नव्याने टेंडर काढावे. तसेच आतापर्यंत मिठागरांची जमीन वापरली जात नव्हती. मात्र आता अदानींसाठी धारावीतील लोकांना तिथे पाठवण्याचा घाट घातला जात आहे. अदानी माझे शत्रू नाहीत. पण जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावेल त्यांच्या विरोधात मी उभा आहे. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

यावेळी पत्रकरांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील भेटीबाबतही प्रश्न विचारला. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अदानी यांच्या समुहाचे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन बडे अधिकारीही उपस्थित असल्याचे म्हटलं जात आहे. शरद पवारांनी अदानींबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी आपली मागणी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला गेला. त्यावर बोलताना आपण तिथे नव्हतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"त्या बैठकीत मी तर नव्हतो. त्याबद्दल पवार साहेबच बोलू शकतील. हे बघा, कोणाची भूमिका काय असावी यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीकरांच्या विकासाच्या आड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारdharavi-acधारावीAdaniअदानी