शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

संकटातल्या जगण्याचा "ट्वेन्टी ट्वेन्टी" थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 6:03 AM

क्रिकेटचा सामना असला, तरी त्यातूनही सकारात्मक विचारांची उजळणी करता येते.. ती कशी? 

ठळक मुद्देनाणेफेक जिंकून घेतलेल्या निर्णयामुळे आपण जिंकतोच असं नाही आणि नाणेफेकीमध्ये पत्कराव्या लागलेल्या निर्णयामुळे हरतो असंही नाही.

- डॉ. राजेंद्र बर्वे

सुरुवातीला तो सात्विक संतापानं बोलत होता. "माझ्या मनोरंजनावर अतिक्रमण करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? अभिव्यक्ती आणि करमणूक कोणी कशी करावी, यावर आपला नागरिक म्हणून हक्क आहे !" त्याला राग आला होता कारण त्याला हव्या तशा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या मॅच होत नव्हत्या. क्रिकेट हा माझ्या मित्राचा हक्क, अधिकार, अभिव्यक्ती वगैरे सर्व काही होतं. बरंच बोलण ऐकल्यावर मी कान पुसून काढला, कारण शिव्यांचा गाळ अडकला होता. फोनवरचा वार्तालाप संपण्याकरता मी म्हटलं ‘तू क्रिकेट या खेळापासून जीवन जगण्याची कला आणि विज्ञान शिकलेला दिसत नाहीस !!"

काही क्षण तो थांबला, मग माझ्यावर घसरला. म्हणाला, "तुला काहीही कुठेही दिसतं. निखळ मनोरंजन, अटीतटीच्या सामन्यातला थरार आणि त्यावेळी होणारी सळसळ समजतच नाही का तुला?"

- मग मात्र संवाद संपला कारण मी ऐकणं सोडून दिलं. बऱ्याच वेळानं तो म्हणाला, "सांग ना गप्प का बसलास?"

मी म्हणालो, "ऐक ! क्रिकेटमध्येही होकारात्मकतेची एक खूण मला गवसलीय.. नीट ऐकलंस तर तुलाही पटेल !"

तर मित्र म्हणाला, "सांग"!

मी सांगत गेलो तर गप्पांच्या शेवटी मित्र म्हणाला, ‘दांडी गुल झाली यार. लॉकडाऊन संपू दे, रविवारी भेट, तुला हरवीन !!’

- आम्ही दोघे हसलो.

-------------------

नाणेफेक :

- म्हणजे नशिबाची पारख, क्षणार्धात होते पण नाणेफेक जिंकल्यानंतर घ्यावा लागतो निर्णय : आधी बॅटिंग की बोलिंग. आपणही कधी नाणेफेक जिंकतो किंवा हरतो. कधी आपले अंदाज चुकतात. नाणेफेक जिंकून घेतलेल्या निर्णयामुळे आपण जिंकतोच असं नाही आणि नाणेफेकीमध्ये पत्कराव्या लागलेल्या निर्णयामुळे हरतो असंही नाही. सध्याच्या काळात तर नाणे फेकणारा कोणी भलताच असला, तरी आपण हरायचं नाही असं ठरवून खेळत राहू !

बॅटिंग :

- यात कला-कौशल्य आणि विज्ञान आहे. बॅटचं वजन, आपले पायाचे आणि हाताचे स्नायू यांची परस्पर मैत्री, बॅट चपळतेने चालवण्याचं कौशल्य, किती जोर लावायचा, बॉलचा वेग आणि अंगावर येण्यामधील ट्रॅजेक्टरी (कमान) हे सारं विज्ञान ! जगतानाही हे सारं महत्त्वाचंच !! बाहेरची परिस्थिती, आपली तयारी, येणाऱ्या संकटातली संधी आणि संधीतलं संकट याचा अचूक वेध घ्यावा लागतो. अत्यंत सावधपणे खेळावं लागतं. सर्वांत महत्त्वाचं ठरते अचूक आणि तत्पर निर्णय क्षमता. प्रत्येक बॉल वेगळा. क्षणस्थ राहून त्यावरच लक्ष. "यानंतरच्या ओव्हरमधला तिसरा बॉल असा टोलवीन" असला विचार म्हणजे नक्कीच बळी, शिवाय आधीच्या चुकलेल्या निर्णयावरती हळहळ म्हणजे नक्की त्रिफळा !!

बॉलिंग :

- आपली चेंडूफेक म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब. चेंडू म्हणजे आपल्याला मिळालेलं अवजार. आपलं शस्त्र. त्यावर सहज पण पकड हवी. खेरीज प्रत्येक चेंडू फेकीत नवी खेळी, नवं धोरण, नवा चकवा म्हणजे आयुष्यातली धूर्त चढाऊ वृत्ती. बरं आपल्या चेंडूच्या अचूक माऱ्याला फलंदाजाने सहज टोलवून आपला पचका केला तरी पुढच्या चेंडू फेकीतील कुशलता हरवून चालत नाही. प्रत्येक चेंडू म्हणजे आपलं सर्वस्व पणाला लावून शत्रूला चकवण्याची, चुचकारून फसविण्याची नामी संधी ! कोविडच्या काळात आपली मुखपट्टी, हात धुणे, सुरक्षित अंतर, लस हे आपले चेंडू आहेत. नीट खेळलो की कोरोनाची दांडी गुल !!

यष्टिरक्षण:

- या खेळाडूची नजर भलतीच तीक्ष्ण आणि शारीरिक लवचिकता लयभारी ! शत्रूच्या गोटात शिरून फलंदाजाचा अभ्यास, त्याच्या चुका हेरण्याची, स्वभाव ओळखण्याची नामी संधी ! प्रत्यक्ष जीवनात हा पवित्रा कधी विलक्षण यशस्वी ठतो. क्षणोक्षणीच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम त्यामुळे कळून येतात. फलंदाजाचा त्रिफळा उडवणं म्हणजे आपल्या कौशल्याची, चपळाईची कमाल असते. असे क्षण हेरण्याकरता सतर्कता असावी लागते.

क्षेत्ररक्षण :

हा खेळाडू म्हणज होकारात्मतेची रम्य शिकवण. आधी कॅच पकडण्याची तयारी, सीमेपर्यंत चेंडू न पोहोचण्याची धडपड, पुन्हा चेंडूफेक करून धावचित करण्याची आणि निदान धाव वाचवण्याची चपळाई... क्षणोक्षणी बदलणारी भूमिका आणि खेळी. विलक्षण लवचिकता आणि निर्णयाच्या अंमलबजावणीची तत्परता. यातून म्हणता म्हणता जीवनातली भूमिका अचानक बदलण्याची मानसिक सज्जता !!

(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)

drrajendrabarve@gmail.com