शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी एका दर्यावर्दीची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 07:00 IST

दिलीप दोंदे लिखित ‘द फर्स्ट इंडियन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’....!

दिलीप दोंदे लिखित ‘द फर्स्ट इंडियन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’. या पुस्तकातून त्यांच्या थरारक अनुभवांचा साक्षीदार होण्याची संधी वाचकांना लाभणार आहे. पुण्यात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या (दि.१९) जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता येथे होणार आहे. त्यानिमित्त दिलीप दोंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद... 

सचिन कोरडे- 

शिडाच्या बोटीतून एकट्याने जग पादाक्रांत केले. अशी पृथ्वी प्रदक्षिणा करणारे कमांडर म्हणजे दिलीप दोंदे. भारताच्या सागरी इतिहासात अशी कामगिरी करणारे ते एकमेवच. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘तारिणी’ या महिलांचा समावेश असलेल्या नौकावीरांगनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : ‘द फर्स्ट इंडियन’ या पुरस्काचा हा अनुवाद, मग तो मराठी वाचकांच्या हाती लवकर यावा, असे वाटले नाही का?
दिलीप दोंदे : निश्चितच वाटले. मी तसा प्रयत्नही केला. परंतु, प्रकाशक मिळत नव्हते. तसेच मी चांगल्या भाषांतरकाराच्या शोधात होतो. अखेर मेहता पब्लिशिंग, पुणे आणि अनुवादक मुक्ता देशपांडे यांच्या संपर्कात आल्याने ते शक्य झाले. मराठीत हे पुस्तक येतेय, ही कल्पना मला खूप सुखकारक वाटत आहे. कारण, माझा आतापर्यंतचा प्रवास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मी स्वत: बारावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतले आहे. नौदलात गेल्यानंतर थोडा मराठीपासूनचा संपर्क कमी झाला. त्यामुळे मला चांगल्या अनुवादकाची आवश्यकता भासत होती. 
पृथ्वी प्रदक्षिणा ही खूप आव्हानात्मक आणि साहसी आहे, याबद्दल काय सांगाल?
- एखादा मनुष्य जेव्हा विनासाहाय्य एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघतो, तेव्हा त्या मोहिमेच्या नियोजनाची, तयारीची आणि प्रत्यक्ष कामांची धुरा उचलणाºया अनेकांच्या सहभागाशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्याशिवाय खलाशी समुद्रात जाऊच शकत नाही. त्यामुळे हे टीम वर्क आहे, असे मी मानतो. मी जेव्हा ‘सेलिंग अलोन अराउंड द वर्ल्ड’ हे पुस्तक वाचले, तेव्हा या पुस्तकाने मला कित्येक दिवस खिळवून ठेवले होते. समुद्रावर प्रेम करणाºयांसाठी आजही हे कथन खिळवून ठेवणारे आहे. यातून मला प्रेरणा मिळाली. मला समुद्राचे आणि त्याहूनही त्यावर डोलणाºया लहान बोटींचे नेहमीच आकर्षण वाटायचे. सर्वसाधारणपणे भारतीयांच्या मनात समुद्राविषयी विचित्र भीती असते. मी या भीतीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी प्रदक्षिणा एका भारतीयाने करावी यासाठी मी भारतात बरीच खटपट केली. जी गोष्ट साध्य करायची आहे, त्याबद्दल भीती बाळगून उपयोग नाही. मग आव्हानं कितीही मोठी असली तरी ती पेलता येतात. 
तुम्ही जगभ्रमंती केली. सागरी सुरक्षेबाबत तुम्हाला काय वाटतं?
- आपण जसा विचार करतो तसे काहीच नाही. सागरी सुरक्षेबाबत प्रत्येक देश जागरूक आहेत. इतरांचे कशाला भारताबद्दल सांगायचे झाल्यास भारतीय तटरक्षक दल किती सक्षम आहे, याची प्रचिती आणि अनुभव आम्हाला बºयाचदा आलेला आहे. अत्याधुनिक यंत्र आणि यंत्रणा सध्या भारताकडे आहेत. मी माझी शिडाची बोट गोव्याच्या समुद्रात चालवत होतो. ती नवीन असल्याचे तटरक्षक दलाच्या लक्षात आले. काही मिनिटांत पेट्रोलिंग करणाºया टीमने आमच्याशी संपर्क साधला. सांगायचे  एवढेच, भारतीय यंत्रणाही सक्षम आहे.
‘तारिणी’नंतर समुद्र मोहीम चर्चेत आली. याबद्दल काय सांगणार?
- ‘म्हादई’नंतर ‘तारिणी’ ही बोटही गोव्यातच बांधण्यात आली. या बोटीची चाचणी करण्यासाठी दोन महिलांना पाठविण्यात आले होते. ज्यांनी कधी समुद्रही पाहिला नव्हता त्या मुली ही बोट घेऊन गेल्या होत्या. मी नौदलातून निवृत्त झालो होतो. तरीसुद्धा या मोहिमेसाठी मी काम केले. तीनवेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मी महिलांना ट्रेनिंग दिलं. सरकारचे सहकार्य आणि मदतीमुळे या महिलांना तारिणी मोहिमेवर पाठवता आलं आणि त्यानंतर त्यांनी  इतिहास रचला.

टॅग्स :Puneपुणे