शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 7:00 AM

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं!

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं! हल्ली लग्नसमारंभात लग्नात आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव घेऊन स्वागत करण्याची अतिशय चुकीची पद्धत सुरू झाली आहे. पूर्वी हे ग्रामीण भागात होत असे,पण ते लोण आता शहरातही आले आहे.हा प्रकार थांबवलाच पाहिजे...- अंकुश काकडे- 

खरं म्हटलं तर विवाहासारख्या समारंभांना आपण ज्यांना निमंत्रण देतो ते सर्वच जण प्रतिष्ठित असतात. असे असताना काही ठराविक लोकांचीच नावे घेऊन स्वागत केले जाते हे कितपत योग्य आहे? पण याचा कुणी विचारच करीत नाही. शिवाय ज्यांची नावे पुकारली जातात त्यातील किती जण प्रतिष्ठित असतात हादेखील प्रश्न उपस्थित होतो. ‘लग्नात आमची नावे पुकारू नका, आमचे हारतुरे, शाल-फेटे, श्रीफळ देऊन स्वागत करू नका, फक्त वेळेत लग्न लावा,’ असे आवाहन करणारे पत्रक (कै.) मोहन धारिया, विठ्ठल तुपे, बाबासाहेब पुरंदरे, खा. गिरीश बापट, विनायक निम्हण, शशिकांत सुतार, उल्हास पवार, तत्कालीन महापौर कमल व्यवहारे, डॉ. एस.बी. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशिवाय अनेक आमदार, नगरसेवकांनी आवाहन केले होते. यासाठी मीच पुढाकार घेतला होता. पुढे आठवडाभर त्याचा थोडा परिणाम दिसला, पण परत हार-तुरे देणे-स्वीकारणे सुरू झाले, पण त्याला शशिकांत सुतार, उल्हास पवार आणि मी, मात्र आजपर्यंत ठाम राहिलो आहोत. कितीही वेळा नाव पुकारले तरी आम्ही स्टेजवर जात नाही. वेळेत लग्न लागलं तर नशीब, लग्न हे मुहूर्तावर लावलं जावं, याला काही शास्त्रीय-धार्मिक आधार आहे. पण त्याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते. शिवाय या प्रतिष्ठित पाहुण्यांना आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावतो हे विसरून त्यांच्या हस्ते जावईमान देण्याचा कार्यक्रम, काही लग्नात असे डझनभर जावई असतात, एक तर ते वेळेवर येत नाहीत, काही जावई तर वराच्या मिरवणुकीत नाचत असतात, तोपर्यंत तो प्रतिष्ठित पाहुणा स्टेजवरच. ज्यांनी हा विवाह जमवला त्याचा सत्कार, जणू काही त्याने उपकारच केलेत.नवरदेव वेळेत येत नाही, आला तर वधूचा पत्ता नाही, एकतर ती पार्लरमध्ये गेलेली असते, तेथे तिला उशीर होतो, परत उशीर झाल्याचं उत्तर ठरलेलं, ट्रॅफीकमध्ये अडकलो होतो. या लग्नसराईत माझ्याच जवळच्या नातेवाइकाच लग्न होतं, मुहूर्त होता ५ वाजताचा. नवरदेव आला ५.४५ वाजता, पण नवरीला येण्यास २० मिनिटे उशीर झाला आणि विशेष म्हणजे ती २० मिनिटे नवरदेव तसाच घोड्यावर बसून राहिला होता, तेही उन्हात. पाहुण्यांचं नाव पुकारताना कोणती तरी संस्था, तिचा अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, आमदार-खासदार, अधिकारी यांची वारंवार भसाड्या आवाजात नावे घेतली जातात, काही वेळा तर त्यांचे सत्कार होत असताना बिचारे वधू-वर १०-१५ मिनिटे केवळ एकमेकांकडे पाहत असतात, काय करणार बिचारे ! काही दिवसांपूर्वी उरळी येथील लग्नसमारंभात माझं नाव कां पुकारलं नाही, म्हणून त्या नाव पुकारणाऱ्याला बाहेर बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अगदी पोलिसांपर्यंत तक्रार करण्यात आली. दुसरी घटना खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुकारून स्वागत का केले नाही म्हणून तेथील नाव पुकारणाऱ्यास मारहण करण्यात आली. बिच्चारे अमोल कोल्हे आता विचार करत असतील मी यासाठी का खासदार झालोय! आता मात्र हे अति झालं असंच म्हणावे लागेल. लग्नाची हौस सर्वांनाच असते, ते थाटामाटात व्हावे हेही आपण समजू शकतो, पण या थाटामाटात जर हे असे प्रकार घडणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार! आता तरी हे थांबवा असे म्हणण्याची वेळ आलीय. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्न