शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

गारूड गांधींचे, जयजयकार टिळक महाराजांचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 08:00 IST

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेले नागपूरचे काँग्रेस अधिवेशन १९२० साली झालेत्या अधिवेशनाच्या शताब्दीचे स्मरण

- श्रीमंत माने

शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक, लेखक महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्यातील कथित वाद, दुरावा, मतभेद रंगवत आले. ब्रिटिश इंडियामध्ये अफगाण सीमेपासून म्यानमारपर्यंत भारतीय उपखंडावर प्रचंड प्रभाव असलेल्या या दोन नेत्यांचा स्वातंत्र्य चळवळीविषयीचा दृष्टिकोन, नेतृत्त्वगुण, संघटनकौशल्य आदींबाबत एकसारखेपणा नसेल. तसे होणेही नव्हते; पण, दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व वाटावे असे टाेकाचे मतभेद होते का? भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेले नागपूरचे काँग्रेस अधिवेशन १९२० साली झाले. त्यातून या प्रश्नाचा काही उलगडा नक्की होतो. कारण, या अधिवेशनावर गारूड होते महात्मा गांधींचे, तर जयजयकार होता लोकमान्य टिळक महाराजांचा.

 

गांधी दक्षिण आफ्रिकेतून १९१५ मध्ये परत आले, तोपर्यंत देशाचे सर्वोच्च नेते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पण, त्यांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला नाही. सुरतेच्या फाटाफुटीनंतर १९०८चे अधिवेशन नागपुरात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण, टिळकांना राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा होऊन मंडाले तुरुंगात रवानगी झाली. सुटका झाल्यानंतर १९१६ च्या लखनौ कराराच्या निमित्ताने टिळकांनीच हिंदू-मुस्लीम ऐेक्याचा पाया घातला. नंतर सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या विरोधातील खटल्यामुळे ते इंग्लंडमध्ये अडकून पडले. ते भारतात परत येताच पाठीराख्यांनी मध्य प्रांतात अधिवेशनाच्या निमित्ताने संधी साधण्याचे ठरविले. अधिवेशन नागपुरात की जबलपूरमध्ये घ्यायचे यावर मात्र मतभेद झाले. वऱ्हाडातील नेत्यांनी मध्य प्रांतातील मराठी नेत्यांच्या पारड्यात वजन टाकल्याने अखेर नागपूरचा निर्णय झाला. पण, टिळकांच्या नशिबी काँग्रेसचे अध्यक्षपद नव्हतेच. अधिवेशनाच्या आयोजकांसाठी ते 'टिळक महाराज' होते. १ ऑगस्ट १९२० ला मुंबईत टिळकांचे निधन झाले. पाठीराख्यांवर जणू वज्राघात झाला.

हतोत्साही नागपूरकरांनी पाँडेचेरीला जाऊन योगी अरविंदांना अध्यक्षपद स्वीकारण्याचे साकडे घातले. स्वागत समितीचे सरचिटणीस डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व डॉ. केशव बळीराम हेडगेवार त्यासाठी तिकडे गेले होते. परंतु, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन ध्यानसाधनेत उर्वरित आयुष्य घालविणाऱ्या योगी अरविंदांना राजी करण्यात त्यांना यश आले नाही. मद्रास प्रांतातील चक्रवर्ती विजयराघवाचारी यांच्या अध्यक्षतेत अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष सेठ जमनालाल बजाज यांच्या नेतृत्वात नागपूरकरांनी नव्याने कंबर कसली. 'नागपूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणीतरी अनोळखी दाक्षिणात्य नेते निवडले गेले', असे गेली शंभर वर्षे सांगितले गेले. पण, प्रत्यक्षात तसे नव्हते. १८ जून १८५२ ला मद्रास प्रांतातील चेंगलपट्टू जिल्ह्यात जन्मलेले, प्रागतिक विचारांचे, काळाच्या पुढे पाहणारे सी. विजयराघवाचारी यांची ओळख 'लॉयन ऑफ साउथ इंडिया' अशी होती.

 

हिंदू-मुस्लीम ऐक्याचा टिळक प्रयोग

टिळकांचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रयोग असहकार आंदोलनाच्या रूपाने गांधींनी पुढे नेला. १३ एप्रिल १९१९ चा जालियनवाला बाग नरसंहार, त्यामुळे निर्माण झालेला असंतोष, तो शमविण्यासाठी आणलेल्या माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणांचा फोलपणा, सुधारणांची लालूच कामी येत नाही हे पाहून आणलेला रौलेट ॲक्ट हा जुलमी कायदा आणि खिलाफत चळवळीच्या रूपाने मुस्लिमांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष ही असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी होती. टिळकांच्या निधनादिवशीच असहकार आंदोलन सुरू झाले. त्यासाठी कोलकातात विशेष सत्र बोलावून गांधींनी आंदोलनाच्या निर्णयावर संमती मिळविली होती. नागपूर अधिवेशनात त्या संमतीवर शिक्कामोर्तब झाले.

बॅ. जिनांची हुर्यो आणि उपहासात्मक महात्मा

लोकमान्य टिळकांशी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे संबंध चांगले असले तरी महात्मा गांधींशी मात्र ते तिरकस वागत. त्याची चुणूक नागपूर अधिवेशनातही दिसली. भाषणात वारंवार ते ''''मिस्टर गांधी'''' असा उल्लेख करत राहिले. सभामंडपातून 'महात्मा म्हणा', 'महात्मा म्हणा', असा गलका झाला की ते उपहासाने 'महात्मा'म्हणायचे. गांधींच्या स्वराज्य संकल्पनेवरही त्यांनी टीका केली. त्या ठरावातील कायदेशीर व शांतीपूर्ण शब्दांचा छल केला. 'रक्तपाताशिवाय न्याय हक्क कसे मिळू शकतील', असा प्रश्न विचारला. परिणामी, गांधींचे गारूड असलेल्या सभागृहाने जिनांची हुर्यो उडवली. भाषण थांबवण्यास भाग पाडले. महात्मा गांधींनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन, 'आपल्याला महात्मा म्हणा' असा अजिबात आग्रह नसल्याचे सांगितले. त्यावरही अनुयायांनी जल्लोष केला.

मराठी गीते, टिळक महाराजांचा जयजयकार

मराठी नेते व मराठी भाषेचा प्रभाव हे नागपूर काँग्रेसचे वैशिष्ट्य. उद्घाटनावेळी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी 'वंदे मातरम्' गायिले. 'आनंदकंद ऐसा, हा हिंद देश माझा' हे प्रसिद्ध गीत लिहिणारे आनंदराव कृष्णाची टेकाडे यांची 'हे राष्ट्ररूपिणी गंगे, घेई नमस्कार माझा' आणि 'जयहिंद देवीची बोला, हर हर महादेव बोला', ही गीते अधिवेशनात राष्ट्रगीते म्हणून गायिली गेली. प्रत्येकवेळी सभामंडपात 'लोकमान्य टिळक महाराज की जय' अशा घोषणा निनादल्या.