शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

छावणीला की दावणीला, की नेत्यांच्या दाराला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 08:05 IST

मराठवाडा वर्तमान : इथे दुष्काळाची तड लागत नाही, तर तिकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा फड रंगात आहे. सध्या गोवंश बंदीचे राजकारण चालले आहे, तर इथे पशुधन म्हणजेच गोवंश जनावरांच्या बाजारात विकला जात आहे. जनावरे ‘छावणीला की दावणीला’ यामध्ये भाजप सरकार ‘नको तो घोटाळा’ म्हणून छावण्यांच्या विरोधात आहे; पण दावणीला बांधलेल्या जनावरांसाठी धोरण नाही. वैरण विकासाच्या नावाखाली दहा कोटी रुपयांची तुटपुंजी तरतूद तेवढी करून ठेवली आहे.

- संजीव उन्हाळे

सरकार कोणतेही असो, भाजपचे की काँग्रेसचे, जनावरांच्या चाऱ्याकडे दोन्ही सरकारांनी दुर्लक्ष केले. एक तर खरिपाचा पेरा ३५ लाख हेक्टरच्या वर गेला आणि रबीचा पेरा कमी झाला. भूम, परांडा या पट्ट्यातील मालदांडी ज्वारी म्हणजे या विभागाचे सौष्ठव होते; पण पाण्याची शाश्वती नसल्याने २६ टक्के ज्वारीचे क्षेत्र यावर्षी अवघ्या ३ टक्क्यांवर आले आहे. बाजरीचे क्षेत्र ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आले आहे. मक्याचा पेरा मात्र कायम राहिला. या पीकरचनेमुळे कडबानिर्मिती थांबली. तथापि, सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याचे भुसकट जनावरांना खावे लागले. जमिनीच्या वाटण्या झाल्या. त्यामुळे नगदी पिकांपुढे कडबा कमी महत्त्वाचा ठरला.

नव्वदीपासून जेव्हा दुष्काळाचे सावट या विभागावर निर्माण झाले तेव्हापासून निकृष्ट जनावरे शेतकरी पाळत नाहीत. ट्रॅक्टरला दोन हजार रुपये दिले की, शेती फणाटून निघते, तिथे बैलांची गरज काय? या स्थितीतही मराठवाड्यात एकंदर ६७ लाख इतके विक्रमी गोधन आहे. त्यामध्ये बीड आणि नांदेडचा वरचा क्रमांक लागतो. यामध्ये १९ लाख केवळ शेळ्या, मेंढ्या आहेत. अलीकडे शेतकरी केवळ लाल कंधारी, देवणी, खिल्लारी, अशी जातिवंत जनावरे पाळू लागले आणि भाकड जनावरांना कोणी विचारेना झाले. म्हणजे जनावरे पाळायची ही दुधासाठी आणि प्रसंगी शेताच्या कामासाठी. अलीकडे सातबाऱ्यावर वैरण पिकाची साधी नोंदही नसते. पशुसंवर्धन विभागाकडे पूर्वी वैरण विकास अधिकारी नावाचे पद होते. ती पदे केव्हाच रद्दबातल ठरली. पुरेसे कर्मचारी नसल्याने उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम चालू आहे. 

असे म्हटले जाते की, जिथे जिथे म्हणून पशुधन आहे तिथे तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. मराठवाड्यामध्ये शेतीला जोड असलेले पशुधन नसल्यामुळेच वर्षाकाठी हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. उपजीविकेच्या साधनामध्ये शेळीला, तर एटीएम म्हणजे आॅल टाईम मनी म्हटले जाते. शेळी वर्षातून दोनदा पिलांना जन्म देते आणि त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. उस्मानाबाद शेळी तर या कोरडवाहू पट्ट्याला जीवदान देते. केवळ शिवसेनेने २०१५ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना शेळ्या वाटण्याचे मोठे काम केले; पण धोरण म्हणून सरकारने काहीही केले नाही. 

मराठवाड्याला या क्षणाला १३ लाख मेट्रिक टन चाऱ्याची गरज आहे. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमातून जिथे पाणी आहे तिथे चारा लावण्याच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद नाही. सरकारने चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ४६० रुपये अनुदान आणि मोफत बियाणे देऊ केले आहे. चाऱ्याची किमान मर्यादा एक एकरने वाढविली आहे. समजा मिळाला तरी त्यातून निर्माण होणारा चारा हा अत्यंत कमी आहे. गाळपेऱ्यामधील आर्द्रतायुक्त जमीन चाऱ्यासाठी योग्य आहे; पण यासाठीसुद्धा शेतकरी पुढे येत नाहीत. चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने परजिल्ह्यात चारा वाहतूक करू नये यासाठी जिल्हाबंदी आदेश लागू केला आहे. हा कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग आहे. 

हे सरकार स्वच्छ आणि पारदर्शक नि:संशयपणे आहे. रस्त्याची मोठी कंत्राटे विदेशी कंपन्यांना मिळाली; पण पक्ष कार्यकर्त्यांना त्यांनी कधी घुसवले नाही. आता ही एक तरी जनावरांची छावणी मिळेल म्हणून आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे. जनावरांच्या छावणीतून एकट्या बीड जिल्ह्यातच २०१३ च्या दुष्काळात मोठा घोटाळा झाला. विरोधी पक्ष त्यावेळी भाजपने मोठा विरोध केला; पण चौकशी मात्र करायची विसरून राहिले. २०१६ च्या केंद्राच्या दुष्काळ मार्गदर्शक सूचनांमध्ये ९० दिवसांच्या वर कोठेही जनावरांची छावणी ठेवता येणार नाही, असाही एक दंडक आहे. याघडीला विभागात किमान ६०० जनावरांच्या छावण्यांचे नियोजन केले असले तरी मार्च महिन्यापर्यंत एकही छावणी उघडणार नाही, हे उघड आहे; पण मग दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय करायचे? 

वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर चारा आणला जाईलही; पण पिण्याचे पाणी कोठून आणायचे, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. मोठ्या जनावरांना एकदा किमान ४० लिटर, छोट्या जनावरांना १५ ते २० लिटर पाणी लागते. अगदी शेळ्या-मेंढ्या असल्या तरी त्यांनाही प्रत्येकी तीन चार लिटर पाण्याची गरज असते, तसेच मोठ्या व लहान जनावरांना अनुक्रमे ६ व ३ किलो चारा लागतो. चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी वाळलेल्या उसाचा चारा म्हणून पर्याय पुढे आला आहे. साखर कारखाने उसाला हमी भाव देऊ शकत नाहीत; पण चाराटंचाईत मात्र ४ हजार रुपये क्विंटल चाऱ्याला भाव मिळत आहे. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करता येईल; पण जनावरांचे काय? या बिकट स्थितीत जनावरे विकण्याशिवाय कोणताच पर्याय हातात नाही. तिकडे भाजपचे मंत्री राम शिंदे म्हणतात, ‘चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा.’ आमचे पाहुणे कुठल्या समृद्ध भागात राहत नाहीत. तेही या दुष्काळी भागातच राहतात. मग ही जनावरे बांधायची कुठे, या नेत्यांच्या दाराला?

टॅग्स :SocialसामाजिकMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरी