शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

भजे, इमरती आणि निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 6:19 PM

प्रासंगिक : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडे सोपविली; पण त्यांनाही फारसे काही करता आले नाही. आता तर सगळाच गोंधळ आहे.

- सुधीर महाजन 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात पुन्हा बस्तान बसवायचे आहे. समाजवादी काँग्रेसच्या काळात हाच मराठवाडा शरद पवारांच्या मागे उभा होता, याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण मधल्या काळात बरेच पाणी वाहून गेले म्हणण्यापेक्षा पवारांच्या राजकारणाचा पोत बदलला आणि मराठवाडा त्यांच्या हातातून शिवसेनेने अलगद काढून घेतला. मराठवाड्यात पुन्हा शिरकाव करण्याची चाचपणी वर्षभरापूर्वी सुरू झाली होती, ती संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि बऱ्याच काळानंतर औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून या हालचाली होत आहेत, हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. कारण रॅली, मेळावे, आंदोलनाचा गलबला वाढला की निवडणुका आल्या, असे सामान्य जनता समजते. जनजागृतीची ही माध्यमे फक्त ताकाला जाताना भांडे लपविण्याचा प्रकार असतो.

परवा अजित पवार आणि सुप्रिया सुळे ही भावंडे औरंगाबाद शहरात होती. त्यांनी मेळावा घेतला. नगरसेवकाच्या वॉर्डांमध्ये विकासकामाचे उद्घाटन केले आणि शहरातील बुद्धिवंतांची एक बैठकही घेतली. म्हणजे समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये चाचपणीचा हा प्रयोग होता. ही चाचपणी येथपर्यंतच थांबली नाही, तर गुलमंडीवरच्या उत्तम उपाहारगृहात जाऊन औरंगाबादच्या प्रसिद्ध इमरती आणि भजे या स्पेशल डिशचा आस्वाद त्यांनी घेतला. भज्याची प्लेट संपण्यापूर्वी ही घटना सोशल मीडियावर व्हायरलही केली गेली. यात औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व, खानपान संस्कृती अधोरेखित करण्यात आली. हा शहराविषयीचा जिव्हाळा दाखविण्याचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हाध्यक्षच नाही, हे वास्तव लपून राहत नाही. पक्ष म्हणून ओळख हरवून बसल्यासारखी स्थिती आहे. पक्षातील मंडळीही जुनीच आहे. इतर पक्षांत त्यांना स्थान मिळवता आले नाही म्हणून ती पवारांसोबत आहे, असेच म्हणावे लागेल.

मराठवाड्यात ४६ आमदार आहेत. त्यापैकी सात राष्ट्रवादी काँग्रेसचे. म्हणजे त्यांची व्होट बँक सात टक्केच म्हणता येईल. बीडमध्ये तर क्षीरसागरांच्याच घरात भांडणे लावून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि शेवटी त्यांची समजूत काढायला समता रॅलीच्या आडून छगन भूजबळांना पाठवले. आपल्याच चुकांमुळे झालेल्या जखमांवर हा मलमपट्टी करण्याचा प्रकार होता. त्यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी बीडला भेट दिली. जालन्यात राजेश टोपे एकटेच आहेत आणि औरंगाबादेत वैजापूरमध्ये भाऊसाहेब चिकटगावकर हे आमदार. ११३ नगरसेवक असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत पक्षाचे केवळ ३ नगरसेवक आहेत.

अशा बळावर राष्ट्रवादी मराठवाड्यात पुनरागमनाचा विचार करते म्हणूनच किल्लारीत पवारांची सभा झाली. त्यापाठोपाठ ते बीडला आले आणि औरंगाबादचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. संविधान बचाव रॅलीसुद्धा स्ट्रॅटेजिक म्हणता येईल. कारण आठ दिवस अगोदरच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या वंचित आघाडीच्या सभेने दलित-मुस्लिम मतांच्या गणितात गडबड व्हायला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘संविधान बचाव’ची मात्रा दलित मत बँकेला लागू पडू शकते, हा धोरणात्मक विचारही त्यामागे दिसतो.

औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडे सोपविली; पण त्यांनाही फारसे काही करता आले नाही. आता तर सगळाच गोंधळ आहे.  संघटन नाही. अशा पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लढण्याची मनीषा पक्ष बाळगतो आणि काँग्रेसकडूनही जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण गेल्या २० वर्षांत काँग्रेसला येथे यश मिळाले नाही. रामकृष्ण बाबा पाटील हे काँग्रेसचे शेवटचे खासदार होते.

ही जागा आपल्याकडे घेऊन पुन्हा मोट बांधण्याची इच्छा आहे. यासाठी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार सतीश चव्हाण यांना पुढे रेटण्याचा प्रयत्न आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था त्यांचे शक्तिस्थान आहे. मराठा कार्ड, पक्षाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा या गोळाबेरजेवर सध्या तरी पक्षात जान आणण्याचा प्रयत्न दिसतो, म्हणूनच इमरती, भजांचा आस्वाद, फळांचा रस, असा सामान्य जनांमध्ये मिसळण्याचा फॉर्म्युला वापरण्यात आला. लोकसभेचे गणित इमरतीच्या वेटोळ्यात कसे बसवता येईल हाच प्रश्न आहे. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक