शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कलेजा खल्लास झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:51 IST

पाणी-पुरी कुठे खायची याचे खवय्यांचे काही निकष आहेत. मुख्य निकष म्हणजे पाणी-पुरी कुठे खायची? तर तशी ती कुठेही खाल्ली तरी चालते पण तरी पाणी-पुरीवाल्याकडे गेल्यावर त्याने पुरी कुठून आणली? असा प्रश्न आवर्जून विचारायचा. जर पुरी तो स्वतःच बनवत असेल तर तो अस्सल पाणी-पुरीवाला आहे, असे समजावे. 

मनाेज गडनीस -आ पला मूड आनंदी असो वा खिन्न, अशा दोन्ही वेळी उत्साहाची पेरणी करणारा जर कोणता पदार्थ असेल तर फक्त पाणी-पुरी ! त्यामुळेच कलेजा खल्लास करणारी ही पाणी-पुरी खवय्यांसाठी नेहमीच पसंतीची मानकरी ठरली आहे. रंजक चवीच्या पाणी-पुरीच्या उगमाबद्दल काही वाद आहेत. मौखिक इतिहासानुसार महाभारत काळात द्रौपदीने याचा शोध लावल्याची आख्यायिका आहे. मात्र, उपलब्ध लिखित नोंदीनुसार या पदार्थाचे मूळ १९ व्या शतकाच्या शेवटी सापडते. रोजीरोटीच्या शोधार्थ एका राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात जाऊ लागले, तेव्हा झालेल्या सांस्कृतिक अभीसरणात त्या लोकांनी आपल्या अन्नपदार्थांच्या विक्रीतून ते पदार्थ तिथल्या मातीत रुजविले. यात सर्वात लोकप्रिय पदार्थ ठरला तो ‘पाणी-पुरी’. पाणी-पुरी या पदार्थाचा उगम हा उत्तरप्रदेशात झाला. तेथील ‘राजकचोरी’ पदार्थातून याची उत्पत्ती झाली. कचोरी सारखीच लहानशा आकाराची पुरी अन् कचोरीसोबत दिल्या जाणाऱ्या चटण्या त्यात मिसळत सर्वप्रथम हा पदार्थ बनला. सुरुवातीला चटण्यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या पाणी-पुरीवर कालौघात असंख्य प्रयोग झाले आणि आज रगडा, उकडलेले मूग-मटकी, बटाटा, खारी बुंदी, चाट मसाला, सोबत चिंच-खजुराचे पाणी अन् मिरची-पुदिना पाणी अशा स्टँडर्ड पद्धतीवर येऊन स्थिरावला आहे. पाणी-पुरी कुठे खायची याचे खवय्यांचे काही निकष आहेत. मुख्य निकष म्हणजे पाणी-पुरी कुठे खायची? तर तशी ती कुठेही खाल्ली तरी चालते पण तरी पाणी-पुरीवाल्याकडे गेल्यावर त्याने पुरी कुठून आणली? असा प्रश्न आवर्जून विचारायचा. जर पुरी तो स्वतःच बनवत असेल तर तो अस्सल पाणी-पुरीवाला आहे, असे समजावे. 

लॉकडाऊनमधे अनेक लोकांनी आपापले आवडते स्ट्रीट फूड घरी बनविण्याचा घाट घातला. गुगलच्या सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त सर्च झालेली रेसिपी होती पाणी-पुरीची.

पाणीपुरीचे अर्थकारणखाद्य-उद्योगाच्या ढोबळ गणितानुसार, सर्व खर्च वगळून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण हे कमाल १०० टक्के आहे. याच गणितात पाणी-पुरीच्या नफ्याचे प्रमाण हे १०० टक्क्यांच्या श्रेणीतील आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांतील कोणत्याही प्रसिद्ध पाणी-पुरी स्टॉलवर दिवसाकाठी किमान पाचशे ते कमाल दोन हजार प्लेटपर्यंत पाणी-प्लेटची विक्री होते. स्टॉलनुसार किंमत २० रुपये ते ६० रुपयांच्या घरात आहे. चाट गाडीवरील या एका पदार्थाद्वारे विक्रेत्याचे उत्पन्न हे ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. 

पदार्थ एक, नावे अनेक उत्तरीय राज्यांत ‘गोलगप्पे’, महाराष्ट्रात ‘पाणी-पुरी’, पंजाब-हरियाणामधे ‘पाणी-पताशी’, मध्यप्रदेशात ‘फुलकी’, गुजरातेत ‘पकोडी’, प. बंगाल, बिहारमधे ‘पुचका’, आसामात ‘पुष्का’, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा-आंध्रप्रदेशात ‘गुपचूप’ अशा नावाने पाणी-पुरी प्रसिद्ध आहे.  

टॅग्स :foodअन्न