शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

वैद्यनाथच्या दुर्घटने प्रकरणी कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:48 IST

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख करण्याची मागणी विधान विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख करण्याची मागणी विधान विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शुक्रवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी आज मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असनु, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवु असे सांगितले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबियांना ताताडीने 10 लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना 5 लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे,  मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष  प्रा.डॉ.मधुकर आघाव, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे