शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर मात करणार यवतमाळचा ‘विश्वासनगर’ पॅटर्न

By admin | Updated: August 18, 2014 00:29 IST

अपुऱ्या पावसाने राज्यातील १२३ तालुके दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय योजना जाहीर तर झाल्यात पण त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून यवतमाळात विश्वासनगर

मोकळ्या जागेवर पुनर्भरण : ‘पाणी साठवा, गाव वाचवा अभियान’
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
अपुऱ्या पावसाने राज्यातील १२३ तालुके दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय योजना जाहीर तर झाल्यात पण त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून यवतमाळात विश्वासनगर पॅटर्नचा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेने ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ अभियान हाती घेतले आहे.
या प्रयोगाची देशभरात अंमलबजावणी व्हावी म्हणून या प्रकल्पाचा प्रस्ताव येथील विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ.नितीन खर्चे यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. यवतमाळातील विश्वासनगराच्या खुल्या जागेवर जलसंधारणाचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वी हा भाग पाणी टंचाईचा भाग म्हणून ओळखला जायचा. या प्रयोगाने या भागाच्या जलस्त्रोतात मोठी वाढ झाली. त्यामुळे या भागाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. या प्रयोगाची माहिती घेतली आणि जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्वावर काही गावांमध्ये तो राबविला जाणार आहे. यवतमाळातील मनिहार ले-आऊटमधून या प्रयोगाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रयोग टंचाईग्रस्त भागात राबविला जाणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रयोगाला मान्यता दिली होती. आता नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल हा प्रयोग राबविण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्हा परिषद प्रशासन ‘पाणी साठवा पाणी वाचवा’ अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने तयारी केली आहे.