शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:04 IST

Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raju Patil Badlapur Sexual Abuse: बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर काही विषयांवर बोट ठेवत आमदार राजू पाटील यांनी एक कविता पोस्ट केली आहे.   

कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावले आहे. 

सरकारला जाग आली नाही, तर...; राजू पाटील काय म्हणाले?

आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपुरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही, तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत."

राजू पाटील यांनी शेअर केलेली 'ती' कविता

छोडो मेहँदी खडक संभालोखुद ही अपना चीर बचा लोद्यूत बिछाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे

कब तक आस लगाओगी तुमबिक़े हुए अखबारों से,कैसी रक्षा मांग रही होदुशासन दरबारों से|

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

कल तक केवल अँधा राजाअब गूंगा बहरा भी हैहोठ सी दिए हैं जनता के,कानों पर पहरा भी है|

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे?सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

मोदींनी व्यक्त केली चिंता, हलगर्जीपणा करणाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. "मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षांना, राज्यातील सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे; दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता सुटायला नको", असे मोदी म्हणाले होते.  

"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रRaju Patilराजू पाटीलMNSमनसेbadlapurबदलापूरMahayutiमहायुती