शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:04 IST

Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raju Patil Badlapur Sexual Abuse: बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर काही विषयांवर बोट ठेवत आमदार राजू पाटील यांनी एक कविता पोस्ट केली आहे.   

कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावले आहे. 

सरकारला जाग आली नाही, तर...; राजू पाटील काय म्हणाले?

आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपुरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही, तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत."

राजू पाटील यांनी शेअर केलेली 'ती' कविता

छोडो मेहँदी खडक संभालोखुद ही अपना चीर बचा लोद्यूत बिछाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे

कब तक आस लगाओगी तुमबिक़े हुए अखबारों से,कैसी रक्षा मांग रही होदुशासन दरबारों से|

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

कल तक केवल अँधा राजाअब गूंगा बहरा भी हैहोठ सी दिए हैं जनता के,कानों पर पहरा भी है|

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे?सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

मोदींनी व्यक्त केली चिंता, हलगर्जीपणा करणाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. "मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षांना, राज्यातील सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे; दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता सुटायला नको", असे मोदी म्हणाले होते.  

"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रRaju Patilराजू पाटीलMNSमनसेbadlapurबदलापूरMahayutiमहायुती