शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:04 IST

Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raju Patil Badlapur Sexual Abuse: बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर काही विषयांवर बोट ठेवत आमदार राजू पाटील यांनी एक कविता पोस्ट केली आहे.   

कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावले आहे. 

सरकारला जाग आली नाही, तर...; राजू पाटील काय म्हणाले?

आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपुरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही, तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत."

राजू पाटील यांनी शेअर केलेली 'ती' कविता

छोडो मेहँदी खडक संभालोखुद ही अपना चीर बचा लोद्यूत बिछाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे

कब तक आस लगाओगी तुमबिक़े हुए अखबारों से,कैसी रक्षा मांग रही होदुशासन दरबारों से|

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

कल तक केवल अँधा राजाअब गूंगा बहरा भी हैहोठ सी दिए हैं जनता के,कानों पर पहरा भी है|

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे?सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

मोदींनी व्यक्त केली चिंता, हलगर्जीपणा करणाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. "मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षांना, राज्यातील सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे; दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता सुटायला नको", असे मोदी म्हणाले होते.  

"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रRaju Patilराजू पाटीलMNSमनसेbadlapurबदलापूरMahayutiमहायुती