शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

महिलांना योग्य सन्मान मिळावा; दृष्टिकोन बदलण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 07:01 IST

Draupadi Murmu: देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलून दाखविली.

 मुंबई -  देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना बोलून दाखविली. महिलांकडे बघण्याची दृष्टी काही ठिकाणी संकुचित दिसते. ती बदलण्याची, सुधारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आज महिला जे काही सोसत आहेत, ते त्यांना पुढे जाऊन भोगावे लागू नये, असेही राष्ट्रपती  म्हणाल्या.

महाराष्ट्रविधान परिषदेचा शतकमहोत्सव सोहळा मंगळवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट वक्ते यांचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला.  कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  

माझ्या मनालाही वेदना मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तेव्हा करोडो भारतीयांप्रमाणे माझ्या मनालाही वेदना झाल्या, परंतु जो पडला तो केवळ पुतळा होता. प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराजांचे स्थान अढळ असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली.

‘गर्जा महाराष्ट्र माझा’संविधानाच्या हस्तलिखिताच्या १५ व्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सुशोभित आहे. म्हणून संविधान व्यवस्थेशी निगडीत या कार्यक्रमात आम्ही शिवाजी महाराजांना विशेष नमन करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘बहुत असो संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या ओळींचा उल्लेख करत कवी राजा बढे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळीही त्यांनी म्हटल्या. 

‘विधान परिषद लोकशाहीचा आधारस्तंभ’विधान परिषद सभागृहाला एक परंपरा लाभली असून, लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक संस्थांपैकी राज्य विधान परिषद आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोपाळकृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वि. स. पागे यांसारख्यांनी राज्याला, देशाला दिशा देण्याचे काम केले, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राज्यातील विधिमंडळ हे देशातील सर्वात महत्त्वपूर्ण सभागृह म्हणून ओळखले जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक सदस्य अत्यंत मेहनतीने काम करत असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूMaharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनVidhan Parishadविधान परिषद