शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार

By बापू सोळुंके | Updated: March 8, 2023 11:35 IST

सुरुवातीला १५ बँकांनी नाकारले होते कर्ज:, कारखान्याची सुमारे दीड कोटीची उलाढाल; बाराजणांना प्रत्यक्ष दिला रोजगार

छत्रपती संभाजीनगर : नववीपर्यंत शिक्षण झाले असल्याने तुम्ही पापड, लोणच्याचा उद्योग करा, असे म्हणत १५ बँकांनी कर्ज नाकारलेल्या उद्योजिका पार्वती महादेव फुंदे यांनी न डगमगता खासगी बँकेकडून कर्ज घेऊन पीव्हीसी पाइपचा कारखाना सुरू केला. आज हा कारखाना यशस्वीपणे चालवून वर्षाकाठी त्या सुमारे दीड कोटीची उलाढाल करीत आहेत. कारखान्यात प्रत्यक्षपणे बाराजणांना रोजगारही दिला आहे. आता त्यांनी ५१ महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प केल्याने सामान्य महिलांसाठी त्या ‘रोल मॉडेल’ ठरत आहेत. बाजारातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या कंपनीचे पाइप कमी दरात मिळत असल्याने हा कारखाना शेतकऱ्यांसाठी आधार बनला आहे.

पार्वतीबाई लग्नानंतर कामगार पतीसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यास आल्या. केवळ नववीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले असल्याने सुरुवातीला त्यांनी कॉलनीतील निरक्षर महिलांना साक्षर करण्याचे काम केले. यानंतर त्यांनी काही दिवस साडी आणि स्टील भांडी विक्रीचे दुकान टाकले. यादरम्यान त्यांची ओळख मुंबईहून राहण्यास आलेल्या महिलेसोबत झाली. त्यांनी त्यांना एमआयडीसीकडून भूखंड घेऊन एखादी कंपनी सुरू करा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी २००० साली शेंद्रा एमआयडीसीमध्ये भूखंड मिळावा, यासाठी एमआयडीसीकडे अर्ज केला. एमआयडीसीने त्यांना २००५ साली एक भूखंड दिला. याकरिता त्यांनी ४० हजार भरले.

शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित पीव्हीसी पाइप बनविण्याचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी विविध १५ राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला. मात्र तुमचे शिक्षण कमी आहे, तुम्हाला पीव्हीसी पाइपचा कारखाना चालविता येणार नाही, असे सांगून त्यांना या उद्योगासाठी कर्ज नाकारले. शेवटी त्यांनी खासगी बँकेकडून कर्ज घेऊन २००६ साली कारखाना सुरू केला. 

चूल आणि मूलपलीकडेही महिला सर्व क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करू शकतात. यामुळेच आम्ही आता समर्थ औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या ५१ सभासद महिलांना स्वत:चा कारखाना सुरू करून स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे. यात एका मोलकरीण महिलेचाही समावेश आहे.  पार्वती महादेव फुंदे, महिला उद्योजिका

स्वत: केलं मार्केटिंगपार्वतीबाई यांनी उत्पादनाआधीच सुमारे वर्षभर त्यांच्या मालाची स्वत: मार्केटिंग करीत पॅम्प्लेट्स, पत्रके तयार करून शेतकऱ्यांना वाटली. बाजारातील अन्य कंपन्यांच्या मालांपेक्षा गुणवत्ता असलेले पाइप कमी दरात त्यांनी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या पाइपला पसंती दिली. आज संपूर्ण राज्यातील शेतकरी त्यांच्या पाइपचे ग्राहक आहेत. परिणामी उत्पादनापेक्षा मागणी अधिक आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनFarmerशेतकरी