शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अधिवास नष्ट झाल्याने इतरत्र जगतोय लांडगा ; संरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 15:29 IST

लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक..

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप : संवर्धनासाठी प्रयत्न

श्रीकिशन काळे -  पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी लांडग्याचा अधिवास असून, त्यांचा प्रजनन काळ आता सुरू होत आहे. मानवी वस्ती वाढत असल्याने त्यांचा अधिवास नष्ट होत असल्याने ते इतर भागात अधिक दिसून येत आहेत. लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक आहे.                लांडगा हा माळरानावरील परिसंस्थेतील सर्वोच्च घटक समजला जातो. पण सध्या कात्रज घाट परिसर, सासवड, मोरगाव, बारामती, दिवे घाट परिसरातील त्याचा अधिवास हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे त्यांना राहण्यायोग्य जागाच शिल्लक नाही. पाण्याच्या स्त्रोतांशेजारी ते आपली गुजराण करीत आहेत. नदीकाठी वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांना ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी मिळत आहे. संरक्षित जमिनीपेक्षा इतर परिसरातच आता लांडगा आपले आयुष्य जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यावर संकट येत आहे. ग्रासलॅँड संस्थेकडून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी शक्यतो लांडग्यांना त्रास न देता त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवे. लांडग्यांच्या अधिवासामध्ये मानवाची ये-जा वाढल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. भारतीय वन कायद्यानूसार लांडग्यांची प्रजाती संरक्षित करण्यात आली आहे. त्यांच्या शिकारीवर प्रतिबंध आहे. नागरिकांनी जर त्यांच्याशी जुळवून घेऊन अधिवासात अधिक हस्तक्षेप केला नाही, तर त्यांची प्रजाती वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ग्रासलॅँड संस्थेचे मिहिर गोडबोले यांनी दिली.

       ते जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी राहतात आणि शिकार करतात. उंदीर, घुशी, ससे, हरणे इत्यादींचा त्यांच्या भक्ष्यात समावेश होतो. क्वचित प्रसंगी ते मनुष्यवस्तीत शिरून गुरांवर व पाळीव जनावरांवर हल्ला करतात, तर कधीकधी ते लहान मुलेही पळवितात.लांडग्यामध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांच्या प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. गर्भावधी ६०-६३ दिवसांचा असून पिले डिसेंबरमध्ये जन्मतात. नैसर्गिक अधिवासात लांडगा १२-१५ वर्षे जगतो.१९७२ सालच्या वन्य जीवांचे रक्षण या कायद्यानुसार भारतात लांडग्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे. 

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार