शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

भाजपसोबत पुन्हा युती कराल का? संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:42 IST

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

ठळक मुद्देअजित पवार हे चांगले सहकारी असल्याचे सांगत आता मानवी बॉम्बमधील वाती विझून नाती निर्माण झाल्याचेशिवसेनेने लिहून दिल्याचेही त्यांनी मान्य करत अशोक चव्हाण खरे बोलल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगले सहकारी असल्याचे सांगत आता मानवी बॉम्बमधील वाती विझून नाती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर शिवसेनेने लिहून दिल्याचेही त्यांनी मान्य करत अशोक चव्हाण खरे बोलल्याचे म्हटले आहे. घटनेला धरून राज्य चालवण्याचं बंधन सगळ्या सरकारवरती असतं. पण अशोक चव्हाणसुद्धा मंत्रिमंडळात मला चांगलंच सहकार्य करताहेत, असे स्पष्टीकरण दिले. 

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

यावेळी संजय राऊतांनी आता मनानं बीजेपीबरोबर नाही आहात किंवा पूर्णपणे तुटलेले आहात. आपण आपली दिशाच वेगळी करून घेतली आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. हा काही खेळ नव्हता. 25-30 वर्षे शिवसेना भाजपासोबत होती. ती केवळ एक राजकारणातली अपरिहार्यता म्हणून नाही. या पक्षात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, नितीन गडकरी होते. त्यांच्यासोबत पारिवारिक नाती आणि ऋणानुबंध निर्माण झाले होते. ते तुटताना यातना झाल्या आहेत, असे सांगत भावनांना वाट मोकळी केली. 

भाजपासोबत युती तोडताना मला या सगळ्या गोष्टीचं दुःख जास्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला, संकटकाळामध्ये पहाडासारखा उभा राहिला. हिंदुत्वावरची सगळी आक्रमणं होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही? भाजपाने विश्वासघात केला, असंच आता म्हणावं लागेल. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललले आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. 

 

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

 

 

तसेच भाजपसाठी खिडकीची फट, दरवाजे उघडा आहे का, या प्रश्नावर त्यांनी असला प्रकार माझ्याकडे नसतो, असे सांगत भाजपासोबतच्या युतीची शक्यता फेटाळली आहे. जे करायचे ते दिलखुलासपणे, जेव्हा सोबत होतो तेव्हा दरवाजाबाहेर गेलात का? तुम्ही स्वतः गेलात. तुम्ही दरवाजा बंद करून बसलात, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरी