शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबत पुन्हा युती कराल का? संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:42 IST

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

ठळक मुद्देअजित पवार हे चांगले सहकारी असल्याचे सांगत आता मानवी बॉम्बमधील वाती विझून नाती निर्माण झाल्याचेशिवसेनेने लिहून दिल्याचेही त्यांनी मान्य करत अशोक चव्हाण खरे बोलल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगले सहकारी असल्याचे सांगत आता मानवी बॉम्बमधील वाती विझून नाती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर शिवसेनेने लिहून दिल्याचेही त्यांनी मान्य करत अशोक चव्हाण खरे बोलल्याचे म्हटले आहे. घटनेला धरून राज्य चालवण्याचं बंधन सगळ्या सरकारवरती असतं. पण अशोक चव्हाणसुद्धा मंत्रिमंडळात मला चांगलंच सहकार्य करताहेत, असे स्पष्टीकरण दिले. 

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

यावेळी संजय राऊतांनी आता मनानं बीजेपीबरोबर नाही आहात किंवा पूर्णपणे तुटलेले आहात. आपण आपली दिशाच वेगळी करून घेतली आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. हा काही खेळ नव्हता. 25-30 वर्षे शिवसेना भाजपासोबत होती. ती केवळ एक राजकारणातली अपरिहार्यता म्हणून नाही. या पक्षात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, नितीन गडकरी होते. त्यांच्यासोबत पारिवारिक नाती आणि ऋणानुबंध निर्माण झाले होते. ते तुटताना यातना झाल्या आहेत, असे सांगत भावनांना वाट मोकळी केली. 

भाजपासोबत युती तोडताना मला या सगळ्या गोष्टीचं दुःख जास्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला, संकटकाळामध्ये पहाडासारखा उभा राहिला. हिंदुत्वावरची सगळी आक्रमणं होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही? भाजपाने विश्वासघात केला, असंच आता म्हणावं लागेल. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललले आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. 

 

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

 

 

तसेच भाजपसाठी खिडकीची फट, दरवाजे उघडा आहे का, या प्रश्नावर त्यांनी असला प्रकार माझ्याकडे नसतो, असे सांगत भाजपासोबतच्या युतीची शक्यता फेटाळली आहे. जे करायचे ते दिलखुलासपणे, जेव्हा सोबत होतो तेव्हा दरवाजाबाहेर गेलात का? तुम्ही स्वतः गेलात. तुम्ही दरवाजा बंद करून बसलात, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरी