शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडणार उभी फूट?; राजू शेट्टींच्या भूमिकेवर मोठी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 10:20 AM

नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली.

प्रविण मरगळे

मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादीसारखे प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडून २ गट तयार झालेत. तशीच स्थिती शेतकरी प्रश्नावर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाली आहे. राजू शेट्टी यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे संघटनेत नाराजीचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी युती तर कधी आघाडी यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे.

अलीकडेच बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी अप्रत्यक्षपणे ही नाराजी बोलून दाखवली. नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटायला लागले तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. आपण ज्यांच्यासोबत राहतो त्याने केसाने गळा कापला तर कसं चालेल. संघटना ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे. चळवळीतून आलेले कार्यकर्ते मेहनतीने संघटना वाढवत आहेत. परंतु नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली. परंतु मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच काम करणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मागील आठवड्यात राजू शेट्टी बुलढाणा दौऱ्यावर आले होते. परंतु त्याची कुठलीही कल्पना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली नाही यावरून ही नाराजी असल्याचे बोलले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे नाराजी आहे. ऊस आणि दूध या आंदोलनाव्यतिरिक्त इतर विषयांवर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रविकांत तूपकर हे स्वतंत्र्यपणे आंदोलन उभे करतायेत. त्यात सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे आंदोलन करतायेत. त्यातून संघटनेत समांतर नेतृत्व घडत असल्याने नेतृत्वाकडून रविकांत तुपकर यांना बाजूला सारण्याचे काम केले जातेय असं सांगितले गेले.

दरम्यान, बुलढाण्यात तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा लाठीचार्ज झाला, तणावाची स्थिती निर्माण झाली. अशावेळीही राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देण्यास दिरंगाई केली. कुठेतरी संघटनेतच तुपकरांना डावललं जातंय अशी भूमिका निर्माण होत असल्चाची माहिती समोर येत आहे. तसेच राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सदाभाऊ खोत यांचे पंख छाटले. देवेंद्र भूयार यांना बाजूला सारले. उल्हास पाटील, माणिक कदम, सयाजी मोरे, पंजाबराव पाटील, दशरथ सावंत हे संघटना सोडून दिले. हे लोकं का सोडून गेले? शेट्टी त्यांच्या मतदारसंघात पूरक अशी भूमिका घेतात. इतक्या वर्षात कापूस, सोयाबीनबाबतीत आक्रमक भूमिका घेतली नाही अशीही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे असं बोलले जाते.

जिल्हापातळीवर वाद, राज्यातला नाही – राजू शेट्टी

मात्र याबाबत ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कुठलीही नाराजी नाही. बुलढाणा जिल्हा संघटनेत हा वाद आहे. रविकांत तुपकर, प्रशांत डिक्कर यांच्यातील तो वाद आहे. मी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार हे प्रत्येकाला माहिती होते. परंतु दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जात नाहीत. नेता म्हणून मी दोघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. रविकांत तुपकर यांच्याही बैठकांना, कार्यक्रमांना मी हजर असतो. कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही. संघटनेतील अंतर्गत वाद आहे. पुढील आठवड्यात तुपकर आणि डिक्कर या दोघांना कोअर कमिटीसमोर बोलावून चर्चा केली जाईल. यातून जो काही निर्णय असेल दोघांना मान्य करावा लागेल असं शेट्टी यांनी म्हटलं.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीRavikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना