शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

"शिकार करा आणि भिंतीवर टांगा"; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 11:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गंभीर इशारा देत गटबाजी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Congress : लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातही काँग्रेसला चांगले यश मिळालं आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशानंतरही पक्षात अनेक वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटाने केली आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवर टांगा अशा शब्दात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. कोणी पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका शिकारीची गोष्ट सांगितली. या चर्चेला मुख्य म्हणजे मुंबई काँग्रेसमधील वादाची किनार होती.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीमध्ये गटबाजी कराल तर याद राखा, असं काही केलं तर थेट कारवाईला सामोरं जावं लागेल असा गंभीर इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आम्हाला माहिती असून त्यामुळे या अशा प्रकारचे कृत्य नको. ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांना दिला आहे. वर्षा गायकवाड, नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्रातील काही गट हे खरगे यांना भेटले होते. त्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रमेश चेन्नीथला यांना हे वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी चैन्नीथला हे ४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असाही इशारा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपवा असं सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं की, पक्षात कोणतीही गटबाजी नाही असे म्हटलं. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले की, "सकाळी नेत्यांचा एक गट आला होता आणि त्यांनी सांगितले की वर्षा गायकवाड यांना हटवा. त्यानंतर दुसरा गट येऊन म्हणाला की वर्षा गायकवाड यांनाच कायम ठेवा. तेवढ्यात इतर नेत्यांचा एक गट आला आणि म्हणाला, नाना पटोले यांना हटवा. त्यानंतर आणखी काही नेते आले आणि म्हणाले की, नाना पटोले अध्यक्षच राहिले पाहिजेत आणि तुम्ही लोक म्हणता की पक्षात गटबाजी नाही." 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडNana Patoleनाना पटोले