शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

"शिकार करा आणि भिंतीवर टांगा"; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 11:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गंभीर इशारा देत गटबाजी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Congress : लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातही काँग्रेसला चांगले यश मिळालं आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशानंतरही पक्षात अनेक वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटाने केली आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवर टांगा अशा शब्दात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. कोणी पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका शिकारीची गोष्ट सांगितली. या चर्चेला मुख्य म्हणजे मुंबई काँग्रेसमधील वादाची किनार होती.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीमध्ये गटबाजी कराल तर याद राखा, असं काही केलं तर थेट कारवाईला सामोरं जावं लागेल असा गंभीर इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आम्हाला माहिती असून त्यामुळे या अशा प्रकारचे कृत्य नको. ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांना दिला आहे. वर्षा गायकवाड, नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्रातील काही गट हे खरगे यांना भेटले होते. त्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रमेश चेन्नीथला यांना हे वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी चैन्नीथला हे ४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असाही इशारा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपवा असं सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं की, पक्षात कोणतीही गटबाजी नाही असे म्हटलं. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले की, "सकाळी नेत्यांचा एक गट आला होता आणि त्यांनी सांगितले की वर्षा गायकवाड यांना हटवा. त्यानंतर दुसरा गट येऊन म्हणाला की वर्षा गायकवाड यांनाच कायम ठेवा. तेवढ्यात इतर नेत्यांचा एक गट आला आणि म्हणाला, नाना पटोले यांना हटवा. त्यानंतर आणखी काही नेते आले आणि म्हणाले की, नाना पटोले अध्यक्षच राहिले पाहिजेत आणि तुम्ही लोक म्हणता की पक्षात गटबाजी नाही." 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडNana Patoleनाना पटोले