शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

"शिकार करा आणि भिंतीवर टांगा"; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 11:59 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गंभीर इशारा देत गटबाजी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Congress : लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातही काँग्रेसला चांगले यश मिळालं आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशानंतरही पक्षात अनेक वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटाने केली आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवर टांगा अशा शब्दात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. कोणी पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका शिकारीची गोष्ट सांगितली. या चर्चेला मुख्य म्हणजे मुंबई काँग्रेसमधील वादाची किनार होती.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीमध्ये गटबाजी कराल तर याद राखा, असं काही केलं तर थेट कारवाईला सामोरं जावं लागेल असा गंभीर इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आम्हाला माहिती असून त्यामुळे या अशा प्रकारचे कृत्य नको. ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांना दिला आहे. वर्षा गायकवाड, नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्रातील काही गट हे खरगे यांना भेटले होते. त्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रमेश चेन्नीथला यांना हे वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी चैन्नीथला हे ४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असाही इशारा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपवा असं सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं की, पक्षात कोणतीही गटबाजी नाही असे म्हटलं. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले की, "सकाळी नेत्यांचा एक गट आला होता आणि त्यांनी सांगितले की वर्षा गायकवाड यांना हटवा. त्यानंतर दुसरा गट येऊन म्हणाला की वर्षा गायकवाड यांनाच कायम ठेवा. तेवढ्यात इतर नेत्यांचा एक गट आला आणि म्हणाला, नाना पटोले यांना हटवा. त्यानंतर आणखी काही नेते आले आणि म्हणाले की, नाना पटोले अध्यक्षच राहिले पाहिजेत आणि तुम्ही लोक म्हणता की पक्षात गटबाजी नाही." 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडNana Patoleनाना पटोले