शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 01:09 IST

आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मुद्द्यावर आज सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, सरकार मागणीवर कार्यवाही करत आहे. थोडा वेळ दिला पाहिजे. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारा ठराव या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. याशिवाय, या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. तसेच, न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये जरांगे पाटील अथवा त्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येईल, असेही सांगितले. यावर, आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील - मनोज जरांगे म्हणाले, "आमचे कुणीही समितीमध्ये जाणार नाही. ना मी, ना आमच्यावतीने कुणी तज्ज्ञ अथवा महाराष्ट्रातील कुणी, आमच्या वतीने कुणीही जाणार नाही. सरकारनेच त्यांचे कुणी समितीत टाकायचे ते टाकावेत. आमच्या वतीने समितीत कुणीही जाणार नाही. तो मोहही आम्हाला नाही. आम्हाला एकच मोह आहे, तो म्हणजे, काहीही करा, पण मराठा समाजाला आणि त्या पोरांना आरक्षण द्या. एवढाच मोह आम्हाला आहे. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे. त्यांनीच तज्ज्ञ टाकावेत आणि समाजाला न्याय द्यावा."

आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "अंतरवलीसह या आंदोलनात सर्वच खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले असतील, तर आम्ही गावाच्या आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही कौतुक करतो आणि स्वागतही करतो."  

...तर आम्ही दोन पावलं मागे येऊ  -पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मी कुणालाही भीत नाही, मी केवळ माझ्या समाजाला भीतो. माझे गावकरी जे भावणिक झाले आहेत मी केवळ त्याला दबतोय. माझ्या माता माऊल्या सगळ्याच गेल्या दोन तासांपासून रडत आहेत, संपूर्ण गाव विनंती करत आहे की, किमान सलाईन तरी घ्या, थोडं पाणी तरी घ्या. ते थोडं माझ्या काळजाला लागतंय. ते माय-बाप आहेत म्हणल्यावर त्यांचे ऐकावे की नाही, या दुविधा मनःस्थितीत आहे. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही. ते रडले नसते, भावणिक झाले नसते, तर मी आणखीही ताठर राहिलो असतो. काय करावे, सुचत नाहीय. पण बघुया, त्यांच्याकडूनही येईलच ना कुणीतरी आम्हाला सांगायला की, कशासाठी वेळ हवा,  का हवा, ते जबाबदारीने काम करणार आहेत का? आम्ही एक पाऊल मागे यायचं म्हणत आहेत, आम्ही दोन पावलं मागे येऊ. पण वेळ का आणि कशासाठी हवा हे आम्हाला कळायलाही हवे आणि तुम्ही खरोखरच करणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा आहे."

आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण -"आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण आहे. त्यांनी आज झालेल्या विषयावर प्रत्यक्ष येऊन आमच्यासोबत चर्चा करावी. त्यांसा सांगावे की, आम्ही तुम्हाला टिकणारे आरक्षण एढ्या दिवसांत देणार, मी आणि माझा मराठी समाज मंगळवारी लगेच बैठक घेतो आणि त्यांना सांगतो. एक पाऊल काय आम्ही दोन पाऊले  मागे येतो." एवढेच नाही, तर "आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील. गोड बोलू आणि वेळ मारून नाही. त्याचे दुष्परिणाम वेगळे होतील. त्यामुळे खरे बोला. सरकार आले आणि खात्री पटली तर मंगळवारी दोन वाजता भूमिका स्पष्ट करणार," असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे