शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर BJP सोबत जाणार नाही; लेखी लिहून देण्यास संजय राऊतांचा नकार, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 08:46 IST

आव्हाडांच्या पत्रावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनीही जाहीर पत्र लिहिलं, त्यात मविआच्या बैठकीत घडलेल्या गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे.

मुंबई - Prakash Ambedkar on Sanjay Raut ( Marathi News ) लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं समोर येत आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु मविआत वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हेदेखील स्पष्ट नाही. त्यात प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवरून मविआतील पक्षांमध्ये चलबिचल झाल्याचं दिसून येते. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मागणी करण्यात आली. मविआतील पक्षांनी मतदारांना आश्वासित करावे की निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही. तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिनिधींनी मौन बाळगलं, ते यावर काहीच बोलले नाहीत. केवळ जितेंद्र आव्हाडांनी लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे असं म्हटलं. मात्र त्याचवेळी बैठकीत उपस्थित असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे लेखी लिहून देण्यास नकार दिला अशी माहिती आता समोर येत आहे. 

मविआकडून विशेषत: संजय राऊत यांच्याकडून सातत्याने प्रकाश आंबेडकर हे देशाच्या संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी आमच्यासोबत राहतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. परंतु स्वत: राऊत यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजपासोबत जाणार नाही असं लेखी लिहून देण्यास नकार दिल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून समोर आलं आहे.  

आव्हाडांना काय दिलं प्रत्युत्तर

आव्हाडांनी लिहिलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनीही पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. त्यात ते म्हणतात की, "जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही, असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड