शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

निवडणुकीनंतर BJP सोबत जाणार नाही; लेखी लिहून देण्यास संजय राऊतांचा नकार, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 08:46 IST

आव्हाडांच्या पत्रावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनीही जाहीर पत्र लिहिलं, त्यात मविआच्या बैठकीत घडलेल्या गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे.

मुंबई - Prakash Ambedkar on Sanjay Raut ( Marathi News ) लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं समोर येत आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु मविआत वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हेदेखील स्पष्ट नाही. त्यात प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवरून मविआतील पक्षांमध्ये चलबिचल झाल्याचं दिसून येते. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मागणी करण्यात आली. मविआतील पक्षांनी मतदारांना आश्वासित करावे की निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही. तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिनिधींनी मौन बाळगलं, ते यावर काहीच बोलले नाहीत. केवळ जितेंद्र आव्हाडांनी लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे असं म्हटलं. मात्र त्याचवेळी बैठकीत उपस्थित असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे लेखी लिहून देण्यास नकार दिला अशी माहिती आता समोर येत आहे. 

मविआकडून विशेषत: संजय राऊत यांच्याकडून सातत्याने प्रकाश आंबेडकर हे देशाच्या संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी आमच्यासोबत राहतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. परंतु स्वत: राऊत यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजपासोबत जाणार नाही असं लेखी लिहून देण्यास नकार दिल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून समोर आलं आहे.  

आव्हाडांना काय दिलं प्रत्युत्तर

आव्हाडांनी लिहिलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनीही पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. त्यात ते म्हणतात की, "जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही, असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड