शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

निवडणुकीनंतर BJP सोबत जाणार नाही; लेखी लिहून देण्यास संजय राऊतांचा नकार, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 08:46 IST

आव्हाडांच्या पत्रावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनीही जाहीर पत्र लिहिलं, त्यात मविआच्या बैठकीत घडलेल्या गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे.

मुंबई - Prakash Ambedkar on Sanjay Raut ( Marathi News ) लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं समोर येत आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु मविआत वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हेदेखील स्पष्ट नाही. त्यात प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवरून मविआतील पक्षांमध्ये चलबिचल झाल्याचं दिसून येते. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मागणी करण्यात आली. मविआतील पक्षांनी मतदारांना आश्वासित करावे की निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही. तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिनिधींनी मौन बाळगलं, ते यावर काहीच बोलले नाहीत. केवळ जितेंद्र आव्हाडांनी लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे असं म्हटलं. मात्र त्याचवेळी बैठकीत उपस्थित असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे लेखी लिहून देण्यास नकार दिला अशी माहिती आता समोर येत आहे. 

मविआकडून विशेषत: संजय राऊत यांच्याकडून सातत्याने प्रकाश आंबेडकर हे देशाच्या संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी आमच्यासोबत राहतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. परंतु स्वत: राऊत यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजपासोबत जाणार नाही असं लेखी लिहून देण्यास नकार दिल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून समोर आलं आहे.  

आव्हाडांना काय दिलं प्रत्युत्तर

आव्हाडांनी लिहिलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनीही पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. त्यात ते म्हणतात की, "जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही, असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड