शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभेसारखे यश मिळणार का? परंपरागत मतदार राखावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:11 IST

गेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला  त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. 

20१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज महाराष्ट्रात हरले. फक्त एक जागा निवडून आली. पाच वर्षांनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस नेत्यांनी दाखविलेले ऐक्य, मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीने उठविलेले रान, कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली निवडणूक, एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात ढवळाढवळ न करता आपले किल्ले शाबूत ठेवण्यावर नेत्यांनी दिलेले लक्ष यामुळे हा विजय मिळाला. ओबीसी, मराठा, दलित, मुस्लीम मतदारांनी मोठी साथ दिली हेही एक महत्त्वाचे कारण होतेच. एरवी गटबाजीचा शाप असलेली काँग्रेस गटतटमुक्त राहिली आणि त्याचा फायदा झाला. 

लोकसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता केंद्रामध्ये येऊ शकली नाही, पण महाराष्ट्राने या आघाडीला मोठे यश दिले. दिल्लीत इंडिया आघाडी आधीपेक्षा मजबूत होण्यात महाराष्ट्राचा आणि काँग्रेसचा मोठा वाटा राहिला. आता त्याच मार्गाने राज्यात आघाडीची सत्ता आणायची तर काँग्रेसला लोकसभेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. काँग्रेसचा विजयाचा घोडा लोकसभेला उधळला आणि  विधानसभेलाही तो उधळेल, असे चित्र असताना हरयाणात काँग्रेसचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीसे निराशेचे वातावरण असले तरी हरयाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असे स्थानिक नेते सांगत आहेत. 

परंपरागत मतदार राखावा लागणारगेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला  त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. महाविकास आघाडीत काँग्रेस तर महायुतीत भाजप असे दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने राज्यात सत्ता मिळविली तर देशातील अन्य राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत सरकार आणण्यासाठीचे मॉडेल म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाईल. तसे होणार की नाही, हे लवकरच ठरेल, घोडा मैदान जवळच आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस