शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 5:43 PM

एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आहे.

मुंबई - राज्यात पराभवाचा धक्का मिळाल्यानंतरही विरोधात बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही सामोपचाराने निवडणुकीला सामोरे जाता आलं नाही, हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले. देशात बलाढ्य झालेल्या भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन उभय पक्षांकडून केले जाते. परंतु, ऐनवेळी आडमुठे धोरणांमुळे महत्त्वाच्या जागा गमवाव्या लागतात.

लोकसभा निवडणुकीत हे प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदार संघातून २०१४ मध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. तेथून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. परंतु, हा मतदार संघ राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी करण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु, राष्ट्रवादीने ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते नगरमधून निवडूनही आले. त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे झाले. राष्ट्रवादीची जागा गेली तर काँग्रेसचे विरोधीपक्षनेते गेले.

इंदारपूरमध्ये नगरचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पाटील यांनी देखील एका कार्यक्रमाला आमंत्रण देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यामुळे पाटील यांच्या पक्षांतराला उधाण आले आहे. यदा कदाचित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, इंदापूरमधून पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना हे नुकसानीचेच ठरणार आहे.

एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आहे.