शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक तयार करण्यापेक्षा पक्षांतर काय वाईट; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोयीची सोयरीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:20 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीमधून बाहेर जाणारे कोणीही या विषयावर खुलेपणाने बोलायला तयार नाहीत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : आपण भाजप, शिवसेनेत गेलो नाही; तर आहे त्या पक्षात राहून निवडून येण्याची शक्यता कमी, शिवाय आपल्या विरोधात भाजप सर्वशक्तीनिशी नवीन माणूस उभा करणार, त्याला ताकद देणार आणि जर तो निवडून आला तर आपली एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाणार, आपल्याच मतदारसंघात नवा विरोधक तयार करण्यापेक्षा आपणच नवीन सोयरीक केलेली काय वाईट? असा विचार करुन आम्ही पक्षांतर करत असल्याचे समर्थन अनेक आमदार व नेत्यांनी केले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीमधून बाहेर जाणारे कोणीही या विषयावर खुलेपणाने बोलायला तयार नाहीत. अनेक आमदारांशी चर्चा केली असता आत्ता तर आम्ही इकडे आलोय, आता कशाला बोलायला लावून आमची अडचण करता? त्यापेक्षा ज्या नेत्यांच्या नकारात्मकतेमुळे आम्ही असे निर्णय घेण्यास मजबूर झालो त्यांना का जाब विचारत नाही, असे म्हणत अनेकांनी जुन्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवरच टीकास्त्र सोडले.

विरोधी पक्ष नेते म्हणून राधाकृष्ण विखे यांचे काम कसे होत होते हे माहिती असूनही कोणी त्यांच्यावर वेळीच कारवाई केली नाही. अशोक चव्हाण सगळी जबाबदारी घ्यायला तयार होते तर त्यांना ती का दिली नाही?विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उमेदवारांना आर्थिक पाठबळ देण्यास असमर्थता दाखवतात, भाषणे देऊ शकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी पक्षातील एकही ज्येष्ठ नेता त्यांचा मतदार संघ राष्ट्रवादीकडून घेऊ शकत नाही. मग हे नेते आमच्यासाठी काय धावून येणार? असे सवाल करत अनेकांनी आपली खदखद बोलून दाखवली.

 आम्ही आज या सरकारच्या विरोधात लढायचे, भाजप आमच्या विरोधात नवीन माणूस उभा करणार, त्यांना ताकद देणार, आम्ही वर्षानुवर्षे बांधून ठेवलेल्या मतदारसंघात नवे नेतृत्व तयार होणार आणि उद्या ते आम्हालाच अडचणीचे ठरणार. त्यापेक्षा आम्हीच तिकडे जातो. उद्या वेळ आली तर परत तरी येता येईल. मात्र, नवीन माणूस तयार झाला तर त्याच्याशी लढण्यात आमची शक्ती वाया जाईल. असा तर्क ही जवळपास सगळ्या पक्षांतर केलेल्या आमदारांनी दिला आहे.

जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाहीराज्यातल्या नेत्यांनी किमान १० मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी, व त्यासाठी कसून प्रयत्न करावेत असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या बैठकीत पुढे आला. मात्र, एकही नेता स्वत:हून त्यासाठी पुढे आला नाही, शेवटी दिल्लीहून विभागवार जबाबदाऱ्या निश्चित कराव्या लागल्या, असेही बैठकीत उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील