शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

का तुटतोय जीवनाचा धागा?

By admin | Updated: November 10, 2014 01:04 IST

उपराजधानीत फुलत असलेल्या प्रेम संबंधाबरोबरच प्रेमवीरांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रेमभंग आणि कौटुंबिक विरोधामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये ९५ जणांनी आत्महत्या केल्या.

प्रेमवीरांच्या आत्महत्या वाढत आहेत राहुल अवसरे - नागपूर उपराजधानीत फुलत असलेल्या प्रेम संबंधाबरोबरच प्रेमवीरांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रेमभंग आणि कौटुंबिक विरोधामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये ९५ जणांनी आत्महत्या केल्या. ही माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालांवरून प्राप्त झाली. बेरोजगारीची भयावह समस्या असताना तरुण स्वत:ला गुलाबी प्रेमात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन हे प्रेमवीर मृत्यूला कवटाळत आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार २०१३ मध्ये १५ प्रियकर आणि ६ प्रेयसी, अशा २१ जणांनी आत्महत्या केली. २०१२ मध्ये सर्वाधिक ३१ प्रेमवीरांनी आत्महत्या केली. त्यात १७ प्रियकर आणि १४ प्रेयसींचा समावेश होता. २०११ मध्ये १४ प्रियकर आणि २ प्रेयसींनी, २०१० मध्ये प्रत्येकी ७ प्रियकर आणि प्रेयसींनी तर २००९ मध्ये ७ प्रियकर आणि ६ पे्रयसींनी आत्महत्या केली. याउलट बेरोजगारीला कंटाळून २०१३ मध्ये ४, २०१२ मध्ये १८, २०११ मध्ये १०, २०१० मध्ये १५ आणि २००९ मध्ये १८ जणांनी आत्महत्या केली. बेरोजगारीच्या कारणापेक्षा प्रेम प्रकरणातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. माध्यमांचा स्वैर वापरमोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या स्वैर वापरातून उपराजधानीत प्रेमीयुगुलांमधील प्रेम फुलत आहे. अँड्राईड मोबाईलवरील ‘व्हाटस् अप’, फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्क प्रेमीयुगुलांना जवळ करीत आहेत. त्यामुळेच चेहरे लपवून मोटारसायकलींवर , सुनसान ठिकाणी आणि बगिच्यात युगुलांची वाढलेली गर्दी दिसत आहे. अचानक दगाबाजी आणि कुटुंबाचा विरोध यातून प्रेमभंग झाला की, मती कुंठीत होते, सारासार विचार करण्याची शक्ती संपुष्टात येते त्यामुळे प्रियकर किंवा प्रेयसी आयुष्याचा शेवट करतात. प्रियकराच्या आत्महत्येचे प्रमाण ५६ टक्के तर प्रेयसीच्या आत्महत्येचे प्रमाण ४४ टक्के आहे. अर्थात प्रियकरापेक्षा प्रेयसीमध्ये भावनिक स्थिरता अधिक असल्याने प्रियकराच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक विरोधातून आत्महत्या अधिकप्रेमीयुगुल आपल्या बहुमोल जीवनाचा अचानक अंत का करून घेतात यामागील कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले की, जातीय, धार्मिक, वर्ण, वयातील तफावत आणि ‘मिस मॅच्ड’ या कारणांमुळे घरातील लोकांचा विरोध होतो. हा विरोध झाल्याने प्रेमीयुगुल, अशा प्रकारची पावले उचलून स्वत:चा शेवट करतात. मिस मॅच्ड म्हणजे उच्चशिक्षित श्रीमंत घराण्यातील मुलीने किंवा मुलाने कमी शिक्षित ‘लेबर’ काम करणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडणे होय. या संबंधाला घरातून प्रचंड विरोध होतो. प्रेमभंगातून होणाऱ्या आत्महत्येमागे निश्चितच मानसिक आजार असतो, अशा लोकांचे समोपदेशन करून त्यांच्यावर मानसोपचार करून काही तरी तोडगा निघू शकते, असेही डॉ. जोशी म्हणाले.