शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जो न्याय सनी देओलला तो नितीन देसाईंना का नाही?; संजय राऊतांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 11:30 IST

नितीन देसाईंनी दिल्लीतील अनेक नेते, मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. माझे स्वप्न वाचवा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते असं तिथली लोकं सांगतात असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई – आमचे धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाशी व्यक्तिगत भांडण नाही. हेमा मालिनी, सनी देओलही हे भाजपाचेच खासदार आहेत. त्यांनी ६०-७० कोटींचे कर्ज घेतले होते आणि हे कर्ज ते फेडू शकले नाहीत. म्हणून त्यांच्या बंगल्याचा लिलाव बँकेने काढला. त्याची नोटीसही सनी देओलला देण्यात आली. जाहिरातही दिली होती. पण २४ तासांत दिल्लीतून सूत्रे हलली आणि लिलाव थांबवला गेला, मग हाच न्याय नितीन देसाई यांना का लावला नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर घणाघात केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, नितीन देसाईंनी दिल्लीतील अनेक नेते, मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. माझे स्वप्न वाचवा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते असं तिथली लोकं सांगतात. परंतु त्यांना वाचवले नाही. दिल्लीतून हे मुंबईत आले त्यानंतर एनडी स्टुडिओला जात त्यांनी आत्महत्या केली. नितीन देसाईंना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. जो न्याय सनी देओलला लावला, कारण ते भाजपाचे खासदार आहेत. स्टार प्रचारक आहेत. मग आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का असा परखड सवालही त्यांनी भाजपा सरकारला विचारला.

२०२४ मध्ये भाजपा सत्तेवर येणार नाही

भाजपाने त्यांच्या उद्योगपती मित्राला ३९०० कोटींचा फायदा कसा मिळवून दिला याबाबत शक्तिसिंह गोहिल यांनी काढलेले प्रकरण गंभीर आहे. केंद्र असो वा महाराष्ट्र प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार होतोय, रोज अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु त्यावर दंगली पेटवायच्या, लव्ह जिहादसारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे आणि मोर्चा काढायचा, बाकी त्यांच्याकडे काय आहे? पण कितीही केले तरी २०२४ साली भाजपा महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही अशी गॅरंटी इंडिया आघाडीकडून मी देतो असा दावा खासदार संजय राऊतांनी केला.

दरम्यान, चंद्रयान ३ चे श्रेय हे भारतातील वैज्ञानिकांचे आहे. जिथे तिरंगा फडकवला गेला तिथे महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचे नाव द्यायला हवे होते. त्यांना भारतरत्न द्यावा. पंडित जवाहरलाल नेहरू, विक्रम साराभाई यासारख्या लोकांनी काम केले त्याचे फळ आता चंद्रयान ३ च्या रुपाने मिळतेय. पण वैज्ञानिक, विज्ञानाला विसरून हिंदुत्व आणले जाते. आम्हीही हिंदुत्ववादी आहोत. परंतु काही गोष्टी विज्ञानाशी संलग्न असतात असं वीर सावरकर म्हणायचे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्याही धर्माचे आक्रमण योग्य नाही असं सांगत संजय राऊतांनी चंद्रयान ३ ज्याठिकाणी उतरले त्या जागेला शिवशक्ती नाव देण्यात आले त्यावरून टीका केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईSunny Deolसनी देओल