शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 20:29 IST

कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

मुंबई - देशात कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्रात आहे. देशभरात आढळणाऱ्या एकूण रुग्ण संख्येपैकी जवळपास अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात समोर येत आहेत. यातच, निवडणूक असलेल्या राज्यांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ का नाही, याचा तपास करावा, असे आम्ही आपल्या टास्क फोर्सला सांगितले असल्याचे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री असलम शेख यांनी म्हटले आहे. (Why corona cases are increasing only in Maharashtra and not in states where elections are being held says aslam shaikh) 

असलम शेख म्हणाले, 'महाराष्ट्रातच कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे. अनेक मंत्री मोठ्या गर्दीत निवडणूक प्रचार करत  आहेत. असे असतानाही तेथील कोरोना रुग्ण संख्येत वाढ नाही,' याचा अभ्यास करावा, असे आम्ही कोविड टास्क फोर्सला सांगितले आहे.

राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यांनी इतर राज्यांचा उल्लेख केला नसला तरी, अप्रत्यक्षपणे त्यांनी इतर राज्यांत कोरोना टेस्ट कमी होत आहेत असेच म्हटले होते. देशात रविवारी दीड हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या देशातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या मुळे चिंता अधिक वाढली आहे. तसेच अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू आणि लॉकडाउनवर सारखी बंधने घातली जात आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस