शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:28 IST

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत

धनाजी कांबळेपुणे : वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला मिळालेली ४१ लाख मते अनेकांची डोकेदुखी ठरली होती. तीच स्थिती विधानसभेला देखील दिसून आली. विशेषत: वंचितने सर्वहारा, शोषित घटकांना सोबत घेऊन केलेले सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी हे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर पडले, याचे चिंतन आता ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या जय-पराजयामध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ५० ते ६० मतदारसंघांत मोठी लढत दिली असून, यापैकी २० ते २५ मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांची मते अनेकांच्या गडांना हादरे देणारी ठरली आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये ४० ते ५० हजारांहून मते घेऊन वंचितने ताकद दाखवून दिली आहे.

वंचितमध्ये सहभागी असलेल्या दलित, ओबीसी, धनगर, अल्पसंख्याक, गरीब मराठा, लिंगायत अशा सर्व समूहांना एकत्र घेऊन एकजातीय ते सर्वसमावेशक अशी पक्षबांधणी केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय, धनदांडग्या उमेदवारांना प्राधान्य न देता सर्वसामान्य माणसाला सत्तेत घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष जागा मिळण्यात काही परिणाम दिसून आलेला नाही.

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. मात्र, साधारण दहा ते बारा मतदारसंघांत वंचितचे उमेदवार पंधराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. १७ जागांवर काँग्रेस, ७ जागांवर भाजप, १४ जागांवर शिवसेना, ११ ठिकाणी राष्ट्रवादी, १० जागांवर अपक्ष, १ जागेवर एमआयएम आणि एका शेकापच्या जागेवर वंचितने उपद्रवमूल्य दाखवून मतांमध्ये आघाडी घेतलेली दिसते. मतांची प्रातिनिधिक आकडेवारी पाहता वंचितला कमी कालावधीत जनतेने दिलेला पाठिंबा म्हणजे आंबेडकरांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग वंचित, शोषित घटकांना सत्तेत घेऊन जाऊ शकते, असा विवास देणारे आहे. स्वखर्चाने भाजी-भाकरी बांधून सभेला जमलेल्या मतदारांना सत्तेत जाण्याचे स्वप्न पाहण्याची दिशा देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.पक्षबांधणीवर लक्ष देणे गरजेचेदलित-बहुजन राजकारणाची घडी विस्कटलेली असताना आंबेडकरांसोबत असलेली जनता मोठ्या प्रमाणात आहे. त्याला स्वाभिमानी नेता, बाबासाहेबांचे नातू, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वैचारिक धारिष्ट्य या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. सत्तेच्या लढाईत तडजोड महत्त्वाची मानली जाते. आंबेडकरांनी समविचारी पक्ष, संघटनांसोबत आघाडी केल्यास वंचितचे प्राबल्य वाढू शकते. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हा भक्कम पर्याय अधिक व्यापक करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर