शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:28 IST

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत

धनाजी कांबळेपुणे : वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला मिळालेली ४१ लाख मते अनेकांची डोकेदुखी ठरली होती. तीच स्थिती विधानसभेला देखील दिसून आली. विशेषत: वंचितने सर्वहारा, शोषित घटकांना सोबत घेऊन केलेले सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी हे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर पडले, याचे चिंतन आता ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या जय-पराजयामध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ५० ते ६० मतदारसंघांत मोठी लढत दिली असून, यापैकी २० ते २५ मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांची मते अनेकांच्या गडांना हादरे देणारी ठरली आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये ४० ते ५० हजारांहून मते घेऊन वंचितने ताकद दाखवून दिली आहे.

वंचितमध्ये सहभागी असलेल्या दलित, ओबीसी, धनगर, अल्पसंख्याक, गरीब मराठा, लिंगायत अशा सर्व समूहांना एकत्र घेऊन एकजातीय ते सर्वसमावेशक अशी पक्षबांधणी केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय, धनदांडग्या उमेदवारांना प्राधान्य न देता सर्वसामान्य माणसाला सत्तेत घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष जागा मिळण्यात काही परिणाम दिसून आलेला नाही.

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. मात्र, साधारण दहा ते बारा मतदारसंघांत वंचितचे उमेदवार पंधराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. १७ जागांवर काँग्रेस, ७ जागांवर भाजप, १४ जागांवर शिवसेना, ११ ठिकाणी राष्ट्रवादी, १० जागांवर अपक्ष, १ जागेवर एमआयएम आणि एका शेकापच्या जागेवर वंचितने उपद्रवमूल्य दाखवून मतांमध्ये आघाडी घेतलेली दिसते. मतांची प्रातिनिधिक आकडेवारी पाहता वंचितला कमी कालावधीत जनतेने दिलेला पाठिंबा म्हणजे आंबेडकरांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग वंचित, शोषित घटकांना सत्तेत घेऊन जाऊ शकते, असा विवास देणारे आहे. स्वखर्चाने भाजी-भाकरी बांधून सभेला जमलेल्या मतदारांना सत्तेत जाण्याचे स्वप्न पाहण्याची दिशा देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.पक्षबांधणीवर लक्ष देणे गरजेचेदलित-बहुजन राजकारणाची घडी विस्कटलेली असताना आंबेडकरांसोबत असलेली जनता मोठ्या प्रमाणात आहे. त्याला स्वाभिमानी नेता, बाबासाहेबांचे नातू, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वैचारिक धारिष्ट्य या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. सत्तेच्या लढाईत तडजोड महत्त्वाची मानली जाते. आंबेडकरांनी समविचारी पक्ष, संघटनांसोबत आघाडी केल्यास वंचितचे प्राबल्य वाढू शकते. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हा भक्कम पर्याय अधिक व्यापक करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर