शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 07:54 IST

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणण्यात पवारांना यश

मुंबई: महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. दोन दिवसांपूर्वी शपथविधी झाल्यानंतर काल महाराष्ट्र विकास आघाडीनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपा-शिवसेनेत वाढलेला दुरावा, शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, राष्ट्रपती राजवट, शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी झालेला घरोबा, त्यानंतर तीन पक्षांनी केलेली सत्तास्थापना अशा अनेक अभूतपूर्व घडामोडी विधानसभा निवडणुकीत घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीनं काल विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. नव्या सरकारच्या स्थापनेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी काढलेले उद्गार खरे ठरले.ऑक्टोबर २०१४ मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना, भाजपाची युती तुटली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनंदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकारणापलिकडील संबंध होते. बाळासाहेब असते, तर शिवसेना सध्यासारखी एकाकी पडली असती का?', असा प्रश्न विचारताच 'कोण म्हणत सेना एकाकी आहे?,' असा प्रतिप्रश्न पवारांनी केला. पवारांच्या या प्रतिप्रश्नानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी क्षणार्धात उत्तर दिलं. पवारांच्या एका विधानाचे अनेक अर्थ निघतात. त्याची जाणीव खुद्द पवारांनाही असल्यानं दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. ‘शिवसेना एकटी लढते आहे, तशीच राष्ट्रवादीसुद्धा एकटीच लढते आहे. तुम्ही आम्हाला एकाकी म्हणत नाही,’ असं पवार म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या नेतृत्त्वांशी माझं काही जुळत नाही. जनरेशन गॅप असावी बहुधा, असा टोला लगावला होता. कोण म्हणत शिवसेना एकाकी, हे शरद पवारांचे ऑक्टोबर २०१४ मधले उद्गार यंदाच्या नोव्हेंबरमध्ये खरे ठरले. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजपापासून दूर गेल्यानंतर 'आम्ही विरोधी बाकांवर बसू' ही भूमिका राष्ट्रवादीनं सोडली. त्यानंतर पवार सतत शिवसेनेच्या संपर्कात होते. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सुरुवातीला काँग्रेस फारशी उत्सुक नव्हती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वाचं मन वळवण्यातही पवारांनी मोठी भूमिका बजावली. त्यानंतर झालेलं अजित पवारांचं बंडदेखील पवारांनी अतिशय चतुराईनं हाताळलं. काँग्रेस आणि शिवसेनेमधला दुवा होत त्यांनी राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आणलं. त्यामुळे ५ वर्षांपूर्वीचे त्यांचे उद्गार खरे ठरले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार