शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 19:26 IST

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : पेरणेफाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात़ या घटनेला २०० वर्षे झाल्यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले़ त्यातून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठी दंगल झाली़ त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती़ या एल्गार परिषदेवरुन आता राजकारण खुप तापले आहे. मात्र, त्यामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल नेमकी कोणी घडविली की घडवून आणली, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या दंगलीमागे नेमका कोणाचा हात होता, याचा छडा लावण्याचे सर्वात मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर पर्यायाने राज्य शासनावर आहे. मात्र, राजकारणात नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडे एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आतापर्यंत ११४ जण निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली होती. ते सर्व जण आता जामीनावर सुटले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात याबाबत एक स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये असलेल्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या या सेलचे काम जवळपास ठप्प झाले आहे. या दंगलीत राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यु झाला होता. त्यातील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. तो गुन्हा सध्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. सहाजिकच एल्गार परिषदेवरुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या तपासातील मतभिन्नतेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आले. गेले काही दिवस हा प्रश्न सातत्याने चर्चेला जात असताना गृहमंत्री म्हणून याबाबत अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असताना तसेच एनआयएकडे एल्गारचा तपास देऊ नये, असा प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. असे असताना त्यांना एल्गार आणि कोरेगाव भीमा हे दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत, याची पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले होते. कोरेगाव भीमाची दंगली ही घडविण्यात आल्याचा आरोप डाव्या पक्षांकडून सातत्याने केला गेला आहे. त्यातूनच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीच्या गुन्ह्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती.ही दंगल घडविल्याचा आरोप करताना त्यातील अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे सांगितले जाते. १ जानेवारी पूर्वी गावातील घरांच्यावर, कमानीवर दगड आणून रचून ठेवले होते. तसेच १ जानेवारीला गावात बंद पाळण्याचे आवाहन करुन संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते, असे आरोप केले जात आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. 

एल्गार परिषदेत जाणिवपूर्वक तपास वेगळ्या दिशेने व काही जणांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन वर्षे होऊनही कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पूर्ण झाला नाही. पोलिसांनी जे आरोपी पकडले, ते सीसीटीव्हीत निष्पन्न झाले होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.मात्र, त्यांना दंगली घडविण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, ते तेथे खरंचे आले होते की त्यांना आणले गेले होते, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. यातील २२ गुन्ह्यांपैकी एकाचाही खटला अद्याप सुरु झालेला नाही़ एल्गारमध्ये ज्याप्रमाणे काही लोकांना जाणीवपूर्वक डांबले गेले असले म्हटले जाते. कोरेगाव भीमाची दंगल ही उजव्या विचाराच्या लोकांनी घडविल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळेच यातील सत्य पुढे येऊ नये, यासाठी हा तपास रेंगाळला गेला आहे का?  ही दंगल खरंच घडविली गेली असेल तर त्यामागील नेमके कोणाचे हात होते, हे सत्य बाहेर आणण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांबरोबरच राज्य शासनावर आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस