शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेचा अभ्यास करताना...

By admin | Updated: March 5, 2017 01:48 IST

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची

- डॉ. शिवांगी झरकर

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची जुगलबंदी. जसे बारावीच्या परीक्षांच्या तारखा घोषित होतात त्यानंतर, रणशिंग फुकल्यासारखे सर्व विद्यार्थ्यांना वाटू लागते आणि अभ्यासाची रेलचेल सुरू होते. परीक्षा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसते... ते असते आपल्या तयारीची, आपण केलेल्या अभ्यासाची आपल्याला असलेली ओळख, म्हणून सर्वप्रथम घाबरणे सोडा. कारण घाबरल्याने तुम्ही जास्त खालावता, हृदयाची गती वाढते, हात-पाय थंड पडतात आणि रक्त गोठते... थोडक्यात, मेंदू आणि मन यांचा एकमेकांशी असलेला समतोल बिघडतो. म्हणून आज आपण जाणून घेऊ या परीक्षेचा अभ्यास करताना काय करावे आणि अभ्यासाची उजळणी कशी करावी.
पूर्ण वर्ष जे काही अभ्यासात शिकलो आहोत, त्याला पूर्णत्वाला नेण्याची वेळ जवळ आली आहे, म्हणजे वर्षभराचा अभ्यासाचा ९५% भाग हा पूर्ण झाला आहे आणि जो ५% भाग उरला आहे... तोच भाग आता ९५%, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. म्हणून या उरलेल्या ५% भागाला, आपले १००% देऊन यशस्वी करायची वेळ जवळ आली आहे, या अमूल्य वेळेला पैशांप्रमाणे जपून वापरा आणि वाचवायचा प्रयत्न करा.

परीक्षेचा आराखडा आणि परीक्षकाची मानसिकता
आराखडा, मार्कांची वाटणी समजून घ्या.
कोणते प्रश्न कितीवेळा आणि कधी येऊन गेले आहेत ते तपासून घ्या. ८०% जे मुद्दे / अभ्यास लक्षात आहेत त्यावर जास्त लक्ष द्या आणि राहिलेले २०% त्याचाही अभ्यास करा; पण सर्व लक्ष जे येत नाही, त्यावर घालण्यापेक्षा जे येते त्यावर घाला. कमी मार्कांच्या प्रश्नांसाठी जास्त वेळ देऊ नका, नाहीतर मोठे प्रश्न राहून जातील. मोठ्या गुणांच्या प्रश्नांसाठी उत्तरे मुद्देसूद आणि प्रत्येक मुद्द्याला क्रमांक घालून सोडवा, जेणेकरून तुमचा पेपर नीटनेटका वाटेल आणि परीक्षकांना तपासायला त्रास होणार नाही. हवे असेल तिथे डायग्राम काढा म्हणजे तुमच्या उत्तराचे महत्त्व निर्माण होईल आणि मार्क्स वाढतील. पेपर्स लिहिताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवा, त्याचबरोबर ३-४ खजूर, चॉकलेट किंवा गोळी तोंडात ठेवा, जेणेकरून तुम्हाला थकावट येणार नाही, घसा कोरडा पडणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे जरी टेंशन आले, तरी विचार करताना तुम्ही घाबरणार नाही. अशा प्रकारे सर्व नियम आणि अभ्यासाचे व परीक्षेचे नियोजन तुम्ही केले, तर परीक्षा तुम्हाला कठीण वाटण्यापेक्षा हवीहवीशी वाटेल. म्हणून ध्यानात ठेवा, परीक्षेत स्वत:शी जिंकलात, तर मार्कांशी आपोआप जिंकाल. सर्वांना शुभेच्छा!

कोणती काळजी घ्यावी? : अभ्यास करताना प्रत्येक ३० मिनिटांनी कमीतकमी ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी. त्यात तुम्ही शांतता देणारे संगीत, ध्यानसाधना, अनुलोम-विलोम यांसारखे श्वासाचे व्यायाम किंवा घरातल्या घरात चालणे, असे थोडे-थोडके व्यायाम करू शकता. जेणेकरून मेंदू सक्षम राहतो आणि ताजेपणा टिकवून ठेवतो.


दर १०-१५ मिनिटांनंतर एक घोट पाणी प्या. जेणेकरून अभ्यास करताना शरीरातील उष्णता आणि पित्त वाढणार नाही. शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी पाणी हा उत्तम उपाय आहे.

विविध प्रकारे अभ्यास कसा करावा?
अभ्यास करताना विषयालगतचे व्हिडीओ किंवा आॅडिओ ऐकावेत. आॅनलाइन माहिती इंटरनेटवरून मिळवावी. व्हिजन बोर्ड बनवावा. अभ्यास केलेले मुद्दे एकदातरी मोठ्याने किंवा मित्र- मैत्रिणींसमोर बोलून दाखवावेत, जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या मेंदूच्या सर्व गोष्टी पक्क्या लक्षात राहतील.

ताणतणाव कसा दूर करावा?
अभ्यास करताना ध्यानमुद्रेचा वापर करावा, त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहतो. अभ्यास सुरू करताना पुस्तकावर हात ठेवून मोठ्याने बोला की, ‘मी हुशार आहे. माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे. माझी या विषयाची उजळणी झाली आहे. मी या विषयात उत्तम गुण मिळवणारच.’

विषयाची उजळणी कशी करावी?
जर एखाद्या विषयाची उजळणी आपण करणार आहोत तर ती पुढीलप्रमाणे करावी-
पहिली ३० मिनिटे : सर्व महत्त्वाचे शीर्षक वाचून घ्यावेत. कारण आपल्या मेंदूला खूप सारी माहिती एकाच वेळेला साठवण्याची सवय नसते आणि मेंदू ते सर्व करण्यासाठी लगेच तयार होत नाही. म्हणून सर्व पाठांतर किंवा उजळणी करायला जाऊ नका, नाही तर, पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशी गोष्ट होईल.
दुसरे २ तास : या दोन तासांत तुम्ही प्रत्येक धड्यातील किंवा शीर्षकातील महत्त्वाचे मुद्दे किंवा सह-शीर्षक लक्षात ठेवा.
तिसरे ३-४ तास : ह्या वेळेत प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाचे मुद्दे, शीर्षक, आराखडा यांची यादी लक्षात ठेवा, त्यामुळे सर्व उत्तरे, सारांश तुमच्या डोक्यात पक्के बसेल आणि तुमच्या मेंदूत त्या त्या विषयाचा एक आराखडा निर्माण होत जाईल.
चौथे १ तास : या तासात तुम्ही एका वाक्यात उत्तरे, जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, असे प्रश्न करा, जेणेकरून सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि मेंदू थकणार नाही.