शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:22 AM

बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणलं जात असल्याचा आरोप

मुंबई : जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम हटवल्याबद्दल पेढे वाटले जात आहेत. मात्र, देशातील ३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार करून जनमताशी प्रतारणा केली, यावर कोणी बोलायला तयार नाही. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. कोणी कितीही संताप व्यक्त केला व कितीही टीका केली, तरी ते निवडून येणार आहेत, याचा त्यांना विश्वास आहे हा सत्तेचा माज आहे. भाजप सोडून राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्र जरी आले, तरी भाजपच जिंकणार. कारण ईव्हीएम मशिन भाजपच्या ताब्यात आहेत, असा आरोप त्यांनी केला. बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणले जात आहे, असेही ते म्हणाले.ईव्हीएम हटवण्याबाबत मी दिल्लीत निवडणूक आयोगाची, सोनिया गांधींची व ममता बॅनर्जींची भेट घेतली. त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे, याची माहिती दिली. त्यांनीही हा धोका मान्य केला व या मुद्द्यावर सोबत असल्याची ग्वाही दिली. मला ईडीची नोटीस आल्याचे वृत्त निराधार आहे, असे ते म्हणाले. मोदींच्या शिक्षणाबाबत माहिती मागितल्याने माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. माहिती कायद्यावर सरकारी अंकुश आणणारा कायदा केला गेला, असे ठाकरे म्हणाले.एका व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा कायदा करण्यात आला. सामाजिक किंवा राजकीय आंदोलन केल्यास त्याला दहशतवादी ठरवून अटक करण्याचे आदेश अमित शहांना मिळाले आहेत. बहुमत असल्याने काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचे म्हणून इंटरनेट बंद करण्यात आले. जमावबंदी लागू करण्यात आली. भविष्यात महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ यांच्याबाबतीत घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.जेट एअरवेज बंद पडली, एअर इंडिया तोट्यात गेली, बीएसएनएलला ५४ हजार कोटींचा तोटा झाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशातील वाहन क्षेत्र प्रचंड अडचणीत असून, त्यामुळे किमान १० लाख कुटुंबे अडचणीत येण्याची भीती आहे. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात १४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सुमारे सहा लाख मध्यम उद्योग बंद पडले आणि हे सर्व एका माणसाला नोटाबंदीचा झटका आल्याने झाल्याची कडवट टीका राज यांनी केली.३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले. पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, जिथे ३७० कलम नाही. मग तिथे गेल्या पाच वर्षांत रोजगार का निर्माण करू शकला नाहीत, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये, म्हणून समान नागरी कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून नागरिकांचे लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या जोरावर मतदान फिरविल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुका, २०१७ च्या महापालिका निवडणुकांत मनसेचा जो निकाल समोर आला, तो मान्य नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे काही खासदार भाजपला मंत्री म्हणून नको होते नेमके त्यांनाच पाडले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.इव्हीएमविरोधी मोर्चा पूरस्थितीमुळे ढकलला पुढेदेशातील निवडणुका फक्त मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, या मागणीसाठी २१ तारखेला काढला जाणारा मोर्चा पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आला आहे. त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे