शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 11:58 IST

आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे.

ठळक मुद्देअमेठीबाबतचा निर्णय अमित शहा घेतील

पुणे : अमेठी मतदारसंघात गांधी घराण्याच्या चार पिढ्या कार्यरत असूनही तेथील शेतकऱ्यांचे भले करू शकल्या नाहीत. मग, ते देशातील शेतक-यांचे काय भले करणार, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला. अमेठीतून लढण्याबाबतचा निर्णय अमित शहा घेतील. मात्र, अमेठीतून कमळ विजयी करावे, असे आवाहन मतदारांना करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. वर्डस काउंट या शब्दोत्सवाचा समारोप इराणी यांच्या हस्ते झाला. विरोधी पक्षांच्या महाआघाडीबाबत बोलताना सायकल पर हाथी बैठा था, तब सायकल पंक्चर हुई थी , असे विधान करत त्या म्हणाल्या, आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने कायम विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि पक्ष म्हणून विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली जातात. इराणी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मला राज्यसभा खासदार केले, त्यानंतर मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून जबाबदारी दिली. संसदेत प्रवेश केल्यावर माझे माध्यमांतील काम मागे पडले. व्यक्तीच्या योगदानाची क्षमता पाहून राजकारणात संधी मिळत असते. मी पाच वेळा राष्ट्रीय कार्यकारिणीत काम केले. सत्याची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आता महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. तीन दशकांपूर्वी सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांनी काम सुरू केले, तेव्हा परिस्थिती खडतर होती. आता माध्यम आणि समाजमाध्यमे आमच्या मदतीला आहेत. महिला असल्याने नव्हे तर सत्तेमध्ये असल्याने ट्रॉलिंग होते. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSmriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा