शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 11:58 IST

आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे.

ठळक मुद्देअमेठीबाबतचा निर्णय अमित शहा घेतील

पुणे : अमेठी मतदारसंघात गांधी घराण्याच्या चार पिढ्या कार्यरत असूनही तेथील शेतकऱ्यांचे भले करू शकल्या नाहीत. मग, ते देशातील शेतक-यांचे काय भले करणार, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला. अमेठीतून लढण्याबाबतचा निर्णय अमित शहा घेतील. मात्र, अमेठीतून कमळ विजयी करावे, असे आवाहन मतदारांना करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. वर्डस काउंट या शब्दोत्सवाचा समारोप इराणी यांच्या हस्ते झाला. विरोधी पक्षांच्या महाआघाडीबाबत बोलताना सायकल पर हाथी बैठा था, तब सायकल पंक्चर हुई थी , असे विधान करत त्या म्हणाल्या, आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने कायम विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि पक्ष म्हणून विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली जातात. इराणी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मला राज्यसभा खासदार केले, त्यानंतर मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून जबाबदारी दिली. संसदेत प्रवेश केल्यावर माझे माध्यमांतील काम मागे पडले. व्यक्तीच्या योगदानाची क्षमता पाहून राजकारणात संधी मिळत असते. मी पाच वेळा राष्ट्रीय कार्यकारिणीत काम केले. सत्याची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आता महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. तीन दशकांपूर्वी सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांनी काम सुरू केले, तेव्हा परिस्थिती खडतर होती. आता माध्यम आणि समाजमाध्यमे आमच्या मदतीला आहेत. महिला असल्याने नव्हे तर सत्तेमध्ये असल्याने ट्रॉलिंग होते. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSmriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा