शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जलपर्णीचा विळखा सुटणार तरी कधी?

By admin | Updated: February 27, 2017 04:07 IST

ठाणे जिल्ह्यातील ४८ लाख नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीला आरोग्यास घातक असलेल्या जलपर्णीचा विळखा कायम आहे.

मुरलीधर भवार,कल्याण- ठाणे जिल्ह्यातील ४८ लाख नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीला आरोग्यास घातक असलेल्या जलपर्णीचा विळखा कायम आहे. ती काढण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याप्रश्नी यंत्रणा गंभीर नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आहे. बारमाही वाहणारी उल्हास नदी राजमाचीच्या डोंगरातून उगम पावते. या नदी पात्रात बारवी व आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. बदलापूरचे बॅरेज धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र, शहाड पंपिंग स्टेशन, केडीएमसीचे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि स्टेम प्राधिकरण या नदी पात्रातून पाणी उचलतात. त्याचा पुरवठा कल्याण-डोंबिवली, उल्हानगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण ग्रामीण, २७ गावे आणि दिवा, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भार्इंदर या परिसरातील ४८ लाख नागरिकांना केला जातो.२०१४ मधील केंद्रीय प्रदूषण अहवालानुसार देशातील ४२ प्रदूषित नद्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात उल्हास नदीही आहे. रासायनिक सांडपाणी योग्य प्रकारे प्रक्रिया न करताच ते या नदी पात्रात सोडले जाते. तसेच काही महापालिका घरगुुती, सांडपाणी व मलमूत्रयुक्त सांडपाणी नदीत नाल्याद्वारे सोडतात. सर्वाधिक प्रदूषित झालेली वालधूनी नदीही उल्हास नदीला कल्याण खाजीनजीक येऊन मिळते. सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.सांडपाण्यामुळे नदी पात्रात जलपर्णी वाढते. उन्हाळ््यात तर ही जलपर्णी झपाट्याने पसरते. पावसाळ््यात पाण्याच्या प्रवाहात ती खाडीला जाऊन मिळते. जलपर्णी असलेल्या पाण्यामुळे असाध्य आजारांची लागण होण्याची भीती आहे. जलपर्णी काढून नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नदी पात्रात दिवसरात्र होडीत बसून उपोषण केले होते. १२ दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. पुन्हा याच मुद्याकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या ढिम्मपणाविषयी निकम यांनी हतबलता व्यक्त केली आहे. >केरळमधून ‘ते’ मशीन आलेच नाहीजलपर्णी काढण्यासाठी कन्व्हेयर बेल्ट असलेली मशीन लागते. ही मशीन केरळूमधून मागवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सरकारी यंत्रणांनी केवळ भासवले होते. प्रत्यक्षात मशीन आलीच नाही. खेमाणी नाला वळवण्याचे आश्वासन तत्कालीन उल्हासनगर महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी निकम यांना दिले होते. त्यासाठी १८ महिने लागतील, असे सांगितले होते. हे आश्वासन मार्च २०१६ मध्ये दिले गेले होते. त्याला आता वर्ष होईल. मात्र, प्रत्यक्षात तेथे काडीमात्र काम झालेले नाही, याकडे निकम यांनी लक्ष वेधले आहे. >प्रदूषण रोखण्यासाठी पैसा नाहीकोट्यावधी रुपयांचे अर्थसंकल्प असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे प्रदूषण रोखण्यासाठी पैसा नाही. राज्य सरकारही त्याविषयी उदासीन आहे. लघू पाटबंधारे पाण्याच्या आरक्षणावर आणि पाणी कपात लागू करून नियोजनाचा मुद्दा पटवून देते. मात्र, पाणी प्रदूषित होणार नाही, याविषयी काही एक पाऊल उचलण्याबाबत विचार करीत नाही, असेही ते म्हणाले.