शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

केव्हा येणार मराठीचे राज्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:17 IST

गेले काही दिवस शाळांविषयीच्या अस्वस्थ करणाºया बातम्या समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ३५ शाळा खासगी संस्थेकडे देण्याचा महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा निर्णय, राज्यातील पुरेशी पटसंख्या नसलेल्या जवळपास १२०० शाळा बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय हे मुद्दे शिक्षण क्षेत्रातील विघातक बदलांकडे स्पष्टपणे बोट दाखवतात.

- डॉ. वीणा सानेकर  शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या व खासगीकरणाच्या दिशेने महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडी बहुजन, वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणावर घाला घालू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील मराठी शाळांकरिता बनवला गेलेला बृहद्आराखडा या शासनाच्या काळात रद्दबातल ठरवला गेला. नव्या मराठी शाळा सुरू होण्याची आशा तर सोडाच जुन्या मराठी शाळांच्याही गळ्याला फास आवळणे सुरू झाले. बड्या धनदांडग्यांच्या शाळा मात्र जोरात फोफावत राहिल्या. २००५नंतर मराठी शाळांच्या मान्यतांचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत गेला. मराठी शाळांना अनुदान किंवा मान्यता म्हणजे सरकारी तिजोरीवरचे ओझे झाले. मराठी शाळा, मराठीतले शिक्षण जगवणे टिकवणे हे शासनाला आपले कर्तव्य वाटत नाही.मराठीच्या कल्याणाची व्यापक दृष्टी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपल्या राज्याच्या पहिल्याच मुख्यमंत्र्यांकडे अशा प्रकारची दूरदृष्टी असणे हे महाराष्ट्राचे भाग्य होते; पण त्यांनी दाखवलेल्या दिशेने महाराष्ट्राची जडणघडण झाली नाही. ती झाली असती तर आज राज्य मराठीचे असते! शिक्षणापासून न्यायालयांपर्यंत सर्वत्र मराठीचे स्थान अबाधित राहिले असते. मराठी शाळा जागवणाºया गावोगावच्या प्रामाणिक माणसांना नैराश्याची पाळी आली नसती. उच्च आणि शालेय शिक्षणात इंग्रजीबरोबर फ्रेंच, जर्मन, जपानीसारख्या भाषांनी मराठीचा अवकाश गिळंकृत केला नसता. तसेच अनेक अभ्यासक्रम आज मराठीत उपलब्ध झाले असते. न्यायालयाच्या दारात न्यायाची वाट पाहण्याची वेळ मराठीवर आली नसती. असो! भूतकाळ काही उलटा फिरवता येत नाही; पण भूतकाळातल्या चुका सुधारण्याची संधी निश्चितच वर्तमान काळात मिळते; पण ती हाती असूनही गमावण्याचा करंटेपण शासकीय पातळीवर सातत्याने सुरू आहे.२०१४ साली डॉ. नागनाथ कोत्तापल्ले समितीने भाषाधोरणाबाबतचा मसुदा पूर्ण करत आणला. त्याबाबतच्या सूचनांचा समावेश करून अधिक काटेकोर मांडणी करण्याकरिता ३ महिन्यांची मुदत या समितीने मागितली होती; पण समितीचा कार्यकाल संपल्याच्या कारणावरून नवी समिती नियुक्त केली गेली. ही समिती डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या नव्या समितीनेही भाषाधोरणाचा मसुदा सादर करून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला; पण हे भाषाधोरण अजून गुलदस्त्यात आहे. आता लवकरच याही समितीचा कार्यकाल संपेल नि मग नवी समिती अवतरेल. समित्यांच्या या खोखोच्या खेळातून एक जाणवते की भाषाधोरण आणण्यात आणि राबवण्यात शासनाला काडीचा रस नाही. एकदा ते स्वीकारले की मग मराठीविषयी ठाम भूमिका शासनाला घ्यावी लागेल; कारण या राज्याची भाषा मराठी आहे. पण मराठी विषयाच्या मूलभूत आणि कळीच्या प्रश्नांना भिडण्याची शासनाची तयारी नाही, म्हणून तर मराठी शाळांची दुर्दशा, उच्च शिक्षणातून हद्दपार होणारे मराठी, मराठी भाषा विभाग दुबळा ठेवणे, मराठीला रोजगाराच्या संधीशी न जोडणे हे प्रतिकूल वास्तव बदलण्याचे चिन्ह आज तरी दिसत नाही. उलट भाषेच्या उत्सवीकरणात आणि इव्हेंट घडवण्यातच शासनाला रस आहे. भाषा व संस्कृतीचे ढोल बडवणारे विद्यमान महाराष्ट्र शासन मराठीबाबत किती संवेदनशील आहे, हा प्रश्नच आहे. आ. ह. साळुंखे यांच्या समितीने तयार केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यातले कोणते मुद्दे परिपूर्ण झाले हेही तपासलेच पाहिजे; पण ते तपासण्याकरिता किंवा भाषेच्या शाश्वत भविष्याकरिता अंतर्मुख होऊन काही एक विचार करावा लागतो. हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेऊन, आपल्या निर्णयांचा उदो-उदो करून हा विचार होऊ शकत नाही. त्याकरिता विरोधी मते समजून घेण्याची खिलाडूवृत्ती लागते. आपल्या पदापेक्षा आपली भाषा श्रेष्ठ आहे, ही जाणीव व्हावी लागते. ही समज, अशी सखोल जाणीव जोपासणारी माणसे आज भाषेशी, शिक्षणाशी निगडित पदांवर नाहीत, हे मराठीचे दुर्दैव! खेरीज ज्या मराठी भाषक समाजाने मराठीच्या मुद्द्यांकरिता राज्यकर्त्यांना जाब विचारायचा, तो समाज एकतर उदासीन आहे, तटस्थ आहे व बेपर्वा आहे. अशा वेळी राज्यकर्त्यांनी समाजाच्या माथ्यावर खापर फोडणे, हेच अधिक सोपे आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी