शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:50 IST

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

चंद्रपूर: निसर्गाच्या अवकृपेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र सदर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही किंवा सरकटक कर्ज माफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत असून कृषी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना अनुदानासंबंधात विचारण्यातच त्यांचा वेळ जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. गावपातळीवर तलाठ्यांनी तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयात सादर केल्या होत्या. यातून शासनाने दिलेली प्रतिहेक्टरी मदत थेट खात्यात जमा करण्यात आली होती. गत खरीप व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा फटका बसला होता.

यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. या शेतकऱ्यांना विविध पीकविमा कमी-अधिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाला होता. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. असे असले तरी अद्यापही काही शेतकरी वंचित आहे. अशीच स्थिती अडीच वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या संदर्भात आहे. निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

त्यामुळे पात्र असताना कर्जमाफी नेमकी अडकली कुठे असे प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान मिळतात की, तेही हवेतच विरतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून यावर्षी कर्जमाफी होईल, असा आशावाद आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.