शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:50 IST

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

चंद्रपूर: निसर्गाच्या अवकृपेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र सदर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही किंवा सरकटक कर्ज माफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत असून कृषी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना अनुदानासंबंधात विचारण्यातच त्यांचा वेळ जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. गावपातळीवर तलाठ्यांनी तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयात सादर केल्या होत्या. यातून शासनाने दिलेली प्रतिहेक्टरी मदत थेट खात्यात जमा करण्यात आली होती. गत खरीप व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा फटका बसला होता.

यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. या शेतकऱ्यांना विविध पीकविमा कमी-अधिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाला होता. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. असे असले तरी अद्यापही काही शेतकरी वंचित आहे. अशीच स्थिती अडीच वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या संदर्भात आहे. निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

त्यामुळे पात्र असताना कर्जमाफी नेमकी अडकली कुठे असे प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान मिळतात की, तेही हवेतच विरतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून यावर्षी कर्जमाफी होईल, असा आशावाद आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.