शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:50 IST

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

चंद्रपूर: निसर्गाच्या अवकृपेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र सदर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही किंवा सरकटक कर्ज माफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत असून कृषी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना अनुदानासंबंधात विचारण्यातच त्यांचा वेळ जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. गावपातळीवर तलाठ्यांनी तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयात सादर केल्या होत्या. यातून शासनाने दिलेली प्रतिहेक्टरी मदत थेट खात्यात जमा करण्यात आली होती. गत खरीप व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा फटका बसला होता.

यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. या शेतकऱ्यांना विविध पीकविमा कमी-अधिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाला होता. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. असे असले तरी अद्यापही काही शेतकरी वंचित आहे. अशीच स्थिती अडीच वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या संदर्भात आहे. निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

त्यामुळे पात्र असताना कर्जमाफी नेमकी अडकली कुठे असे प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान मिळतात की, तेही हवेतच विरतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून यावर्षी कर्जमाफी होईल, असा आशावाद आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.