शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित; सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:50 IST

निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

चंद्रपूर: निसर्गाच्या अवकृपेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र सदर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही किंवा सरकटक कर्ज माफीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत असून कृषी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना अनुदानासंबंधात विचारण्यातच त्यांचा वेळ जात आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. गावपातळीवर तलाठ्यांनी तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयात सादर केल्या होत्या. यातून शासनाने दिलेली प्रतिहेक्टरी मदत थेट खात्यात जमा करण्यात आली होती. गत खरीप व रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा फटका बसला होता.

यातील काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. या शेतकऱ्यांना विविध पीकविमा कमी-अधिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाला होता. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. असे असले तरी अद्यापही काही शेतकरी वंचित आहे. अशीच स्थिती अडीच वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या संदर्भात आहे. निर्धारित तारखेतील बदल, वारंवार येणारे शासन निर्णय, बैठका व संकलित केली जाणारी माहिती एवढे सर्व करूनही आजही अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.

त्यामुळे पात्र असताना कर्जमाफी नेमकी अडकली कुठे असे प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान मिळतात की, तेही हवेतच विरतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून यावर्षी कर्जमाफी होईल, असा आशावाद आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी यासंदर्भात ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची घोषणा कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.