शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

11 लाख आदिवासी कुटुंबांना मदत मिळणार कधी?, ऑगस्टमध्ये निर्णय, तरी फक्त सर्वेक्षणाचाच घोळ

By यदू जोशी | Published: November 05, 2020 1:04 AM

tribal : १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर १७ सप्टेंबरला शासन आदेश निघाला होता. त्यालाही आता दीड महिना लोटला आहे.

-   यदु जोशी

मुंबई : ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने १२ ऑगस्ट रोजी घेतला होता.  तीन महिने होत आले तरी अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ४८६ कोटी रुपयांच्या मदतीपासून आदिवासी कोरोनाच्या संकटकाळात वंचितच राहिले आहेत. आधी लाभार्थींची संख्या जाहीर केली आता लाभार्थी ठरविण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. १२ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर १७ सप्टेंबरला शासन आदेश निघाला होता. त्यालाही आता दीड महिना लोटला आहे. प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यात दोन हजार रुपये टाकायचे आणि मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपये किमतीचा किराणा देण्याचा निर्णय झाला होता. कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका आदिवासींना बसला. शहरात रोजगारासाठी गेलेले आदिवासी बांधव पाडे, गावांकडे परतले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने मांडला. या दिरंगाई संदर्भात आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना वारंवार विचारणा केली पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शासन निर्णयानुसार, मनरेगावरील चार लाख मजूर, आदिम जमातीची २ लाख २६ हजार कुटुंबे, ६४ हजार पारधी कुटुंबे, गरजू परितक्त्या, घटस्फोटित, विधवा, भूमिहिन यांची तीन लाख कुटुंबे आणि वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या १ लाख ६५ हजार कुटुंबांना ही मदत दिली जाणार होती. अद्याप त्यांच्या नशिबी प्रतीक्षाच आहे. 

मदत तर दूरच सर्वेक्षणाचा घोळ सुरूप्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत कोणत्या ११ लाख ५५ हजार कुटुंबांना देणार हे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी आदिवासींची नावे निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचा घोळ घातला जात आहे. या सर्वेक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांना कामाला जुंपण्यात आले आहे. सर्वेक्षणही किचकट आहे. आदिवासींना जातीचा दाखला, आधार कार्डापासून अनेक प्रकारची माहिती मागितली जाणार आहे. हे सर्वेक्षण होणार कधी? अन् मदत मिळणार कधी? वित्त विभाग आणि आदिवासी विभागातील मतभिन्नतेचा फटकाही मदतीला बसला असल्याची चर्चा आहे. 

लॉकडाऊनमुळे गाव/पाड्यांवर परतलेले हजारो आदिवासी मजूर आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. तरीही सरकारी मदतीचा घोळ सुरू आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे आदिवासींना कोरोनाच्या संकटात मदत देण्याचा उद्देशच पराभूत होत आहे.     - प्रतिभा शिंदे, अध्यक्ष, लोकसंघर्ष मोर्चा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र