शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनींवरील अर्धवट प्रकल्पांचे मूल्यांकन केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:26 IST

वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात.

अमरावती : वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. परंतु, कालांतराने वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने हे प्रकल्प अर्धवट राहतात. राज्यात अशा प्रकल्पांचे अद्यापही मूल्यांकन झाले नाहीत, हे विशेष. 

केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने २१ मार्च २०११ रोजी वनसंवर्धन कायदा १९८० कलम ४ (४) मधील तरतुदीत सुधारणा केली आहे. वनसंवर्धन कायद्यांतर्गत सादर प्रस्तावात वनजमीन किंवा वनेत्तर जमिनींचा समावेश असल्यास त्या प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच कामे सुरू करावे, अशी स्पष्ट नियमावली आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार अथवा एजन्सीकडून परवानगी मिळाल्याचे गृहीत धरून खासगी जमिनींवरील प्रकल्पाची कामे केली जातात. तथापि, वनजमिनींवरील प्रकल्पांना मान्यता मिळत नसल्याने ती रखडली जातात. दुसरीकडे मान्यता मिळाली नाही, अशी ओरड करून ती कामे प्रलंबित ठेवली जाते. परिणामी वनविभागाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सात वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची मान्यता तपासली जात नाही. त्यामुळे वनजमिंनीवर किती प्रकल्प रखडले? याचे मूल्यांकन वनविभागाने केले नाही. 

विनापरवानगीने वनजमिनींवर प्रकल्प सुरू केल्याप्रकरणी दोषींविरूद्ध पोलिसात फौजदारी दाखल केली अथवा नाही, हादेखील मुद्दा महत्त्वाचा मानला जाणारा आहे. राज्यात ‘वन’ संज्ञेच्या जमिनी त्या प्रस्तावात न दर्शवून हजारो हेक्टर जमिनींचे नक्त मूल्य व दुप्पट क्षेत्रावरील रोपवनाचा १० वर्षांचा खर्च यावर पाचपट दंडाची रक्कम व त्यावर १२ टक्के व्याजाची रक्कम अशी प्रतिहेक्टर ३ कोटी रुपये बुडविण्यास सहकार्य करण्यात आले व तो प्रकार आजही कायम आहे.

मूल्यांकन विभाग करतो तरी काय?वनसंवर्धन कायदा १९८० ची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर येथे सन २००७ मध्ये केंद्रस्थ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली प्री व पोस्ट इव्हॅल्युएशन (मूल्यांकन) करण्यासाठी १ मुख्य वनसंरक्षक, १ विभागीय वनाधिकारी, २ सहायक वनसंरक्षक व वनसर्व्हेक्षक ही पदे शासनाने मंजूर केली आहेत. परंतु, ११ वर्षांत त्या पदावर कार्यरत एकाही व्यक्तीने क्षेत्रीय कामे न तपासता वातानुकुलीत केबीनमध्ये बसून प्रकल्पांची तपासणी करण्याची किमया केली आहे. या विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन व भत्त्यापोटी दरवर्षी लाखोंचा खर्च होत असताना याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

वरूड- पांढुर्णा महामार्गाचे काम प्रलंबितकेंद्र सरकारच्या नियंत्रणात सुरू असलेल्या मध्यप्रदेशकडे जाणारा वरूड- पांढुर्णा राज्य महामार्गांचा काही भाग वनजमिनींवरून गेला आहे. सिमेंट क्राँक्रिटीकरणाद्वारे हा मार्ग साकारण्याचे काम सुरू झाले. मात्र, वनजमिनींवर या मार्गाचे कामे सुरू होताच मोर्शी वनक्षेत्राधिकाऱ्यांनी एजन्सीविरूद्ध पोलिसात धाव घेतली. विनापरवानगीने वृक्ष कापणे आणि वनजमिनींवर कामे केल्याप्रकरणी तक्रार नोंदविली. त्यामुळे वनजमिनींच्या हद्दीतील मार्गाचे काम प्रलंबित आहे. 

  • वरूड ते पांढुर्णा या राज्य महामार्गाचे वनजमिनींवरील कामे रखडली आहेत. केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. परंतु खासगी जमिनींवर महामार्गाचे कामे सुरू आहे.

   - अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती वनविभाग

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग