शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:06 IST

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला.

मुंबई – कालचक्र नेहमी फिरत असते. कोण कोणाला म्हसनात पाठवेल हे कळेल. जनता सगळ्यांना उत्तर देईल अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर लढवणार आणि जिंकणारही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जवळजवळ ज्या कारवाया झाल्यात त्या कोर्टात सिद्ध झाल्या. परंतु कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोर्टाने नाकारले नाहीत. जे आरोपपत्र दाखल झाले त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली. संजय राऊतांचे काम केवळ तपास यंत्रणावर संशय निर्माण करण्याचं आहे. जे जे अनैतिक आहे म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना-भाजपात तेढ निर्माण करण्याचं काम राऊतांचे आहे. २०१४ पासून गेल्या ८ वर्षापासून हेच सुरू आहे असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.

तसेच भाजपा नेत्यांवर आरोप असतील तर न्यायालय आहे. अनिल देशमुखांबाबत जयश्री पाटील कोर्टात गेल्या. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे. राऊतांना कोर्टात जाता येत नसेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्याचसोबत तपास संस्थांवर प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतीय संविधानाने यंत्रणा बनवल्या आहेत. संविधानाच्या चौकटीत या तपास यंत्रणा काम करतात. त्यावर आरोप करणं योग्य नाही. भाजपा कधीही यंत्रणांवर अविश्वास दाखवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद सुळेंनी ग्रामीण भागात फिरावं

सदानंद सुळे यांनी ग्रामीण भागात राहायला शिका. आई पोराला म्हसनात जा म्हणते अशी म्हण आहे. सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा प्रश्न नाही. भाजपा कधीही महिलांचा अपमान करत नाही. तुमच्या पत्नीचा असो वा कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सदानंद सुळेंना दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात मिळालं नव्हतं. शिवसेनेचं मनोबल आणि मविआ सरकारचं मनोबल खच्चीकरण होत नाही. भाजपा नेत्यांविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. नवलानीला कुणी पळवले त्याचे उत्तर द्यावे असं संजय राऊतांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत