शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:06 IST

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला.

मुंबई – कालचक्र नेहमी फिरत असते. कोण कोणाला म्हसनात पाठवेल हे कळेल. जनता सगळ्यांना उत्तर देईल अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर लढवणार आणि जिंकणारही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जवळजवळ ज्या कारवाया झाल्यात त्या कोर्टात सिद्ध झाल्या. परंतु कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोर्टाने नाकारले नाहीत. जे आरोपपत्र दाखल झाले त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली. संजय राऊतांचे काम केवळ तपास यंत्रणावर संशय निर्माण करण्याचं आहे. जे जे अनैतिक आहे म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना-भाजपात तेढ निर्माण करण्याचं काम राऊतांचे आहे. २०१४ पासून गेल्या ८ वर्षापासून हेच सुरू आहे असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.

तसेच भाजपा नेत्यांवर आरोप असतील तर न्यायालय आहे. अनिल देशमुखांबाबत जयश्री पाटील कोर्टात गेल्या. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे. राऊतांना कोर्टात जाता येत नसेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्याचसोबत तपास संस्थांवर प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतीय संविधानाने यंत्रणा बनवल्या आहेत. संविधानाच्या चौकटीत या तपास यंत्रणा काम करतात. त्यावर आरोप करणं योग्य नाही. भाजपा कधीही यंत्रणांवर अविश्वास दाखवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद सुळेंनी ग्रामीण भागात फिरावं

सदानंद सुळे यांनी ग्रामीण भागात राहायला शिका. आई पोराला म्हसनात जा म्हणते अशी म्हण आहे. सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा प्रश्न नाही. भाजपा कधीही महिलांचा अपमान करत नाही. तुमच्या पत्नीचा असो वा कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सदानंद सुळेंना दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात मिळालं नव्हतं. शिवसेनेचं मनोबल आणि मविआ सरकारचं मनोबल खच्चीकरण होत नाही. भाजपा नेत्यांविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. नवलानीला कुणी पळवले त्याचे उत्तर द्यावे असं संजय राऊतांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत