शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:06 IST

Maharashtra Vidhan Sabha Result: निवडणुकीची अशी काठावर तारखा असताना घोषणा करण्यात आली तेव्हाच संजय राऊतांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजुने आहेत. असे असले तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत कोणालाच बहुमत मिळाले नाही तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. 

२३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ ४८ तास हातात आहेत. महायुती आणि मविआने अपक्ष, छोट पक्ष आणि महाशक्तीच्या नेत्यांना फोनाफोनी सुरु केली असून बहुतासाठी गरज लागलीच तर मदत कोण करू शकेल याची चाचपणी सुरु केली आहे. 

महत्वाचे म्हणजे सत्ता स्थापन करण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण असेल यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता आहे. यानंतर मंत्रिपदे, यात काही फिस्कटले तर या बाजुचे त्या बाजुला आणि त्या बाजुचे या बाजुला होण्याचीही दाट शक्यता आहे. 

सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होण्याचीही शक्यता आहे. राजकारणात काहीही होऊ शकते असे संकेत अजित पवारांनी निवडणूक काळातही दिले आहेत. यामुळे सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतात. भाजपच्या जागा कमी आल्या तर पुन्हा एकनाथ शिंदे तोडपाणी करत मुख्यमंत्री पद घेऊ शकतात. या सर्व गोष्टींना ४८ तासांत करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक आहे. 

निवडणुकीची अशी काठावर तारखा असताना घोषणा करण्यात आली तेव्हाच संजय राऊतांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. राऊतांच्या आरोप खरा-खोटा ठरविण्यापेक्षा सध्याची परिस्थिती तिकडेच बोट दाखवत आहे. आमदारांना राज्यभरातून मुंबईत यासाठी यावे लागणार आहे. २३ तारखेला अनेकांना रात्री उशीरा निवडणूक आयोग प्रमाणपत्र देतो. यानंतर त्यांना मुंबईत येण्यासाठी मिळेल तो मार्ग पकडून यावे लागते. 

अशातच जर बहुमताचा आकडा कोणालाच पार करता आला नाही तर या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरु होतात. यामुळे या आमदारांना कुठेतरी दूर हॉटेलमध्ये नेऊन एकत्र ठेवावे लागते. यात आमदारांचा घोडेबाजारालाही उत येतो. अनेक आमदार फोन बंद करून बसतात, यामुळे तो पक्षही या काळात गॅसवरच राहतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनेल असे संकेत मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी या उद्या, २३ तारखेला ठरणार आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी