शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काय केले? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 01:57 IST

रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथील  सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने राज्य सरकारने कायमस्वरूपी वैद्यकीय कर्मचारी भरण्यासाठी काय पावले उचलली आहेत, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले.रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपी १८१ वैद्यकीय कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे निर्देश कोल्हापूर आरोग्य सेवेच्या उपसंचालकांनी दिले. संबंधित प्रशासनाने जाहिरात देऊनही केवळ ३४ जणांची नियुक्ती करण्यात आली. ५४ पदे अद्यापही रिक्तच आहेत. रत्नागिरीत कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी पुरेसे डॉक्टर नाहीत तसेच वैद्यकीय कर्मचारीही नाहीत. त्यामुळे रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अमजद सय्यद व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. राज्य सरकारने वैद्यकीय कर्मचाºयांच्या तात्पुरत्या स्वरूपी नियुक्त्यांसाठी वेळोवेळी जाहिराती दिल्या आहेत. मात्र, कोणीही प्रतिसाद देण्यासाठी तयार नाही, अशी माहिती सरकारी वकील रीना साळुंके यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhospitalहॉस्पिटल