शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

शुकदासांच्या आश्रमात सारस्वतांचा मांडव कशासाठी? ‘अंनिस’चा आक्षेप , साहित्य संमेलनाच्या स्थळावरून वाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:34 IST

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी भूमिका अंनिसने घेतली आहे. तर साहित्य संमेलनाच्या आयोजनात नाक खाजवून अपशकून करू नका, सारस्वतांच्या सन्मानात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी केले आहे.

नागपूर/पुणे/ बुलडाणा : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी भूमिका अंनिसने घेतली आहे. तर साहित्य संमेलनाच्या आयोजनात नाक खाजवून अपशकून करू नका, सारस्वतांच्या सन्मानात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हिवरा आश्रम येथे साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी घोषणा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. मात्र, हिवरा आश्रम येथे संमेलन भरविण्यास अंनिसचे संस्थापक संघटक श्याम मानव तेसच राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी आक्षेप घेतला आहे. साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात कशासाठी, असा सवाल श्याम मानव यांनी केला आहे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापरणाºया, पण प्रत्यक्षात रजनिशांच्या तंबूतील उंट असणाºया ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते?नेमका काय आहे वाद?बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे १४ जानेवारी १९६५ रोजी शुकदास महाराज यांनी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. सध्या येथे दोन कृषि महाविद्यालय, निवासी अपंग व कर्णबधीर विद्यालय तसेच कॉन्व्हेंट शाळा चालविली जाते. शुकदास महाराज यांचा पूर्वी अकोला शहरातील सुधीर कॉलनीमध्ये आश्रम होता. अंनिसचे शाम मानव यांनी त्यांच्यावर स्त्री लंपट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुकदास महाराज यांनी अकोला सोडून हिवरा येथे आश्रमाची स्थापना केली. ४ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.हा तर प्रसिद्धीसाठी खटाटोपविवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २००१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचा अवमान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव व त्यांचे सहकारी करत आहेत. अ.भा.साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप मानव करत असल्याचा आरोप विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. याचवेळी त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी शुकदास महाराज यांनी नाही तर विवेकानंद आश्रमातर्फे महामंडळाकडे अर्ज करण्यात आला होता. हे संमेलन आश्रम घेणार नाही तर ते विदर्भ साहित्य संघ घेणार आहे. आश्रम हे फक्त ठिकाण आहे. तेथे संमेलन होण्याचा आणि महाराजांचा काही एक संबंध नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे संमेलन होणार आहे.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसंमेलन वादात गोवणे योग्य नाहीहिवरा आश्रमविषयी पूर्वी वाद झाले असतील, मात्र सध्याची स्थिती पाहणे औचित्याचे ठरेल. स्थळाच्या भूतकाळाशी आता होऊ घातलेल्या संमेलनाचा संबंध जोडणे योग्य नाही. स्थळ पाहणी समितीने अनुकूल प्रतिक्रिया दिल्यानंतर, साहित्य महामंडळाने बहुमताने निर्णय घेतला तो मान्य करायला हरकत नाही.- डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्षसर्वांनी विवेकाने निर्णय घ्यावासर्व धर्मातील ढोंगीबाबा निंदनीय व निषेधार्ह आहेत. त्यामुळे अंनिसची भूमिका योग्य आहे. मात्र साहित्य संमेलन स्थळाचा वाद विनाकारण आहे. साहित्य महामंडळ अंधश्रद्ध नाही आणि ज्यांच्या नावावर आश्रम आहे ते विवेकानंद अंधश्रद्ध नाही. त्यामुळे दाभोलकरांची अंनिस, श्याम मानवांची अंनिस व महामंडळाने एकत्रित येऊन विवेकाने याबाबत निर्णय घ्यावा.- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष